बिहारमध्ये तेजस्वी यादव -राहुल गांधीं जोडीची बल्ले-बल्ले ,पहिला सर्व्हे

Tejashwi Yadav-Rahul Gandhi duo bat-bat in Bihar, first survey

bj admission
bj admission

 

 

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एक आश्चर्यकारक सर्व्हे समोर आला आहे. वोट वाइबचे सह संस्थापक अमिताभ तिवारी यांच्या सर्व्हे नुसार बिहारमध्ये महागठबंधन एनडीएच्या थोडंस पुढं दिसत आहे.

BREAKING NEWS;गृहमंत्री अमित शाह यांचे निवृत्तीबाबत मोठे विधान

 

36 टक्के लोकांचा विश्वास इंडिया आघाडीवर आहे. तर, 35 टक्के लोकांचा विश्वास एनडीएवर आहे. म्हणजेच बिहारमध्ये विजय मिळवणं कोणत्याही आघाडीसाठी सोपं दिसून येत नाही.

 

 

प्रशांत किशोर यांच्या जनसुराजला 10 टक्के लोक पर्याय मानत आहेत. नोकरीच्या मुद्यावर 40 टक्के लोकांचा विश्वास महागठबंधनवर दिसून येतो. एनडीएच्या बाबत विचार केल्यास हा आकडा 30 टक्क्यांपर्यंत कमी होतो.

 

भाजपच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश
अमिताभ तिवारी यांनी दोन्ही आघाड्यांचे मतदार निश्चित असल्याचं म्हटलं. महागठबंधनकडे मुस्लिम यादव मतदार आहे. तर एनडीएकडे EBC, महादलित, उच्च जात समुहातील मतदार आहेत.

 

सरकर विरोधात 48 टक्के लोकांमध्ये नाराजी आहे. तर, 54 टक्के लोकांना त्यांचा आमदार बदलायचा आहे. नाराजीचा फायदा महागठबंधन आणि जन सुराज यांच्यात विभागला जाण्याची शक्यता आहे.

आमदारांची बदनामी थांबवण्यासाठी मागितली कोटीची खंडणी; दहा लाख घेताना रंगेहात अटक

सी वोटरचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी मतदार यादी पडताळणीमुळं मतदारांमध्ये अस्वस्थता आहे. यामुळं विरोधी पक्षांना नुकसान होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं. मात्र, उच्च जातीमधील लोक देखील त्रस्त आहेत.

 

 

प्रसांत किशोर याबाबत बोलताना यशवंत देशमुख एनडीए आणि महागठबंधनला नुकसान पोहोचवू शकतात असं म्हटलं. जनतेतील मोठ्या समुहाला वाटतं प्रशांत किशोर दोन्ही आघाडींची मत कमी करु शकतात.

 

नोकरी लावून देतो म्हणून सव्वा कोटी रुपये लुबाडले; गळफास घेऊन आत्महत्या

यशवंत देशमुख पुढं म्हणाले, की मुख्यमंत्री नितीशकुमार यांचं सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कमी सक्रीय असणं एनडीएचं नुकसान करु शकतं.

 

त्याचवेळी तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाची पहिली पसंत आहेत. मात्र, त्यांचं निवडणूक अभियान अजूनही आक्रमक दिसून येत नाही.

 

बनियान घालून आमदारांचं आंदोलन, ‘चड्डी बनियान गँग’च्या घोषणांनी विधिमंडळ दणाणलं

वरिष्ठ पत्रकार सतीश के सिंह यांच्या मते अलीकडच्या काळात झालेल्या हत्यांच्या घटनांमुळं कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यामुळं एनडीएचा जंगलराजचा मुद्दा कमजोर झाला आहे.

 

 

सतीश के सिंह यांच्या मते बेरोजगारीच्या मुद्यावर बिहारमध्ये आणीबाणी सारखी स्थिती आहे. या मुद्यावर तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनला फायदा मिळू शकतो. नितीश कुमार यांची गैरहजेरी आणि बिघडलेली कायदा व सुव्यवस्था यामुळं एनडीएला धक्का बसत आहे.

बनियान घालून आमदारांचं आंदोलन, ‘चड्डी बनियान गँग’च्या घोषणांनी विधिमंडळ दणाणलं

 

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाकडून सुरु करण्यात आलेल्या मतदार यादीच्या स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजनमुळं विरोधी पक्ष आक्रमक झालेत.

 

 

Related Articles