महायुतीत पहिली मोठी फुट
The first major split in the Mahayuti
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता युती आणि आघाडी करण्यासाठी राजकीय पक्षांत मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत आपल्याच पक्षाची सरशी व्हावी यासाठी सर्वच बडे नेते प्रयत्नरत आहेत.
नाशिकमध्ये तर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे 11 नगरपरिषदांपैकी एकूण 3 नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी महायुतीत उभी फुट पडली आहे.
महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट,10 जिल्ह्यांना हाय अलर्ट
अजित पवार यांच्या पक्षाचे नेते समीर भुजबळ यांनी काहीही झालं तरी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी युती करणार नाही,
असं थेट जाहीर करून टाकलं आहे. विशेष म्हणजे भाजपालाही नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात समेट घडवून आणणे अशक्य असल्याचे वाटत आहे.
अमेरिकेत विमानाचा भीषण अपघात ; उड्डाण घेताच कोसळले पाहा .. VIDEO
राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांनी आज (10 नोव्हेंबर) भाजपाचे नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीत युतीबाबत चर्चा करण्यात आली.
ही भेट झाल्यानंतर समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीची नगपरिषदेची रणनीती त्यांनी स्पष्ट केली. येवल्यात आमच्या राष्ट्रवादी पक्षाची स्वबळावर लढण्याची तयारी आहे.
हवामान विभागाचा 7, 8, 9 आणि 10 नोव्हेंबरला अलर्ट, मोठा इशारा,
परंतु काहीचं म्हणणं आहे की भाजपासोबत ही निवडणूक लढवली तर ते सोईचं राहील. येवल्यात शिंदे गटाची काही ताकद नाही. ते आमचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे तिथे आम्ही त्यांच्यासोबत युती करू शकत नाही,
अशी माहिती समीर भुजबळ यांनी दिली. तसेच, मनमाड आणि नांदगावमध्येही अशीच स्थिती आहे. तेथे शिंदे गट आमचा विरोधक आहे. त्यामुळे तिथे शिंदे गटासोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही, असे समीर भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.
कर्जमाफीवरून राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
तर दुसरीकडे आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार सुहास कांदे मला भेटून गेले आहेत. तासाभराने समीर भुजबळ हेदेखील मला भेटून गेले आहेत.
आम्ही सर्वांशी चर्चा करत आहोत. नाशिक जिल्ह्याती नगरपालिका, नगरपरिषदा आहेत, त्या सोबत लढवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे साहजिकच ते वेगळे लढतील, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफीवरून राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
त्यामुळे नाशिकध्ये तीन नगरपरिषदांसाठी महायुतीत उभी फुट पडल्याचे आता जवळजवळ स्पष्ट झाले असून तेथे नेमकं कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.







