महापालिका निवडणुकीत भाजप-MIM युती

BJP-MIM alliance in the municipal elections

 

 

अकोला जिल्हा तसा प्रयोगशील मानल्या जातो. बाळासाहेब आंबेडकर यांनी भारिप बहुजन आघाडीचा प्रयोग इथेच यशस्वी करून दाखवला. त्यामुळे अकोल्याला राजकीय, सामाजिक प्रयोग नवीन नाहीत.

असदुद्दीन ओवेसींच्या सभेत पोलिसांचा लाठीचार्ज

पण आताच्या अकोट पॅटर्नने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणला. कारण पार्टी विथ डिफरन्स असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती आणि विचारधाराच गुंडाळून ठेवल्याचे समोर आले आहे.

 

अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी चक्क ऑल इंडिया इत्तेहादूल मुस्लिमीन सोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

असदुद्दीन ओवेसींच्या सभेत पोलिसांचा लाठीचार्ज

तर भाजपवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. इतकेच नाही तर अंबरनाथमध्ये सुद्धा काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याचे मोठे धाडस स्थानिक भाजप नेतृत्वाने दाखवले आहे. कटोगे तो बटोगेचा नारा आणि आता थेट एमआयएमशी हातमिळवणी यामुळे भाजपवर टीकेची झोड उठली आहे.

 

 

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अकोटमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. पण बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला मोठी खेळी खेळावी लागली.

उमेदवाराने एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला

विचारधारेशी फारकत घ्यावी लागली. अकोट विकास मंचाचा हा प्रयोग राज्यात गाजला. कारण या मंचात भाजप 11 जागांनिशी आघाडीवर आहे.

 

तर एमआयएम 5 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या मंचात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि बच्चू कडू यांच्या प्रहारचे नगरसेवक आहेत.

उमेदवार बिनविरोध कसे झाले मनसेकडून थेट पुरावे सादर

अकोटमध्ये एकूण 33 सदस्य आहेत. त्यात अकोट विकास मंचाचे 25 सदस्य आणि नगराध्यक्ष पदाच्या माया धुळे मिळून 26 जण झाले आहेत. तर काँग्रेसचे 6 आणि वंचितचे 2 सदस्य हे विरोधी गोटात असतील.

 

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतही असाच अनोखा प्रयोग झाला आहे. येथे मित्रपक्ष शिंदे गटाला खो देत भाजपने काँग्रेसच्या हातात कमळ दिले आहे.

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे भाजपच्या वाटेवर? आंबेडकरांचा दावा

या नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसने सत्तेसाठी हातमिळवणी केली आहे. या नवीन सत्ता समीकरणावर शिंदे सेना नाराज झाली आहे.

 

तर दुसरीकडे काँग्रेसमधूनही नाराजीचा सूर आळवण्यात आला आहे. पण भाजपने दोन्ही ठिकाणी दाखवलेल्या धाडसाची राज्यभर चर्चा रंगली आहे.

 

याप्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी खास उत्तर दिले आहे. अकोटमध्ये भाजप एमआयएम युतीविषयी त्यांना विचारले असता हा भाजपचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.

हवामान विभागाचा राज्यात पावसाचा इशारा, अलर्ट जारी

याप्रश्नावर भाजपचे नेते उत्तर देतील असे त्यांनी सांगितले. तर अंबरनाथमध्ये आम्ही काँग्रेसच्या विरोधात उठाव केला होता. काँग्रेसला आमचा विरोध होता आणि राहील, असे ते म्हणाले. राज्यात आणि केंद्रात महायुती आहे, त्यामुळे आम्ही अशी आघाडी केली नाही असा टोलाही शिंदेंनी लगावला.

 

दरम्यान अकोट आणि अंबरनाथ पॅटर्नवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळींवर झालेल्या एमआयएम आणि कांग्रेससोबतच्या आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

भरारी पथकाची मोठी कारवाई,अडीच कोटींची रक्कम सापडली

अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम तसेच अंबरनाथमध्ये भाजप आणि कांग्रेस अशी युती झाल्याने मुख्यमंत्र्यांकडून स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. आता याप्रकरणी पुढे काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

दरम्यान भाजप आणि काँग्रेस यांची अंबरनाथमध्ये युती झाल्याची बातमी समोर येताच प्रचंड खळबळ माजली. एकीकडे काँग्रेसमुक्त भारतचा नारा देणाऱ्या भाजपने सत्तेसाठी अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेसशी हातमिळवणी केल्याच्या चर्चा सुरू झाल्या

 

आणि राजकीय वर्तुळात भूकंप झाला. शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याने पक्षाने मूळ विचारधारा सोडल्याची टीकाही करण्यात आली.

 

यानंतर भाजपचे नेते, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस या हे युतीमुळे स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज असल्याचेही वृत्त समोर आले.

 

याचदरम्यान आता आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. भाजपप्रमाणेच काँग्रेसच्या वरिष्ठांनाही ही युती खपली नसून काँग्रेसतर्फे स्पष्ट उत्तर देऊन याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यात आला आहे.

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया समोर आली असून भाजप-काँग्रेस युतीवर ते स्पष्टच बोलले आहेत. ‘ अंबरनाथमधून अशा बातम्या येत आहेत की, भाजप आणि काँग्रेसची युती होत आहे.

 

सर्वप्रथम मला हे स्पष्ट करायचं आहे की या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. भाजप आणि काँग्रेस हे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. आमची विचारधारा ही संविधानाची आहे.

 

सर्वधर्म समभावाचं आहे. आम्ही जात पात, प्रांत, भाषा हे सगळं सोडून फक्त भारतीयत्व मानणारे आहोत. त्यामुळे अशा परिस्थितीत जर आमचा कोणीही नेता, कार्यकर्ता असं (युती) करण्याचा प्रयत्न करत असेल,

 

तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा संदेश वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

 

त्यामुळे अशी युती करण्याचा कोणी जर विचारही केला किंवा प्रयत्न केले तर त्यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल ‘ असा इशारा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला.

 

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या मुद्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. अंबरनाथ मध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक आले आहेत. निवडणूक लढताना भाजपसोबत कुठलाही संबंध नाही. आमच्या नगरसेवकांनी कुणालाही पाठिंबा दिला नाही असं ते म्हणाले.

 

आमचा भाजपला पाठिंबा नाही. आम्ही भाजप सोबत जाणार नाही असं सांगत पक्षाने काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांकडून स्पष्टीकरण मागितलं आहे, असं सपकाळ यांनी सांगितलं.

 

अकोटमधील भाजप आणि एमआयएमच्या युतीवरही त्यांनी टीका केली. ” भाजप आणि एमआयएम एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत, हे दिसून आलं. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे’ अशा शब्दांत सपकाळ यांनी टीकास्त्र सोडलं.

 

Related Articles