केस पांढरे होऊन उपयोग काय, भुजबळांच्या भाषणावर जरांगे पाटलांच प्रत्युत्तर
What is the use of gray hair, Jarange Patla's reply to Bhujbal's speech

वय झाल्यामुळे भुजबळ असं बोलतात, त्यांचे केस पांढरे होऊन उपयोग काय, जर दुसऱ्या समाजाबद्दल आकस असेल.’ असं म्हणत जरांगे पाटलांनी हिंगोलीतील भुजबळांच्या भाषणावर प्रत्युत्तर दिलं आहे.
हिंगोलीतील ओबीसी एल्गार सभेतून छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांची चांगलाच समाचार घेतला. मला म्हातारा म्हणतोय,पण डोक्याचे जेवढे केस पिकलेत तेवढी आंदोलनं केलीत, असं भुजबळांनी म्हटलं बोलताना म्हटलं होतं.
तुमच्या पांढऱ्या केसांचा आता काही उपयोग नाही, असं म्हणत जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला. सध्या राज्यात सुरु असलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय. तसेच भुजबळ आणि जरांगे पाटलांकडून एकमेकांवर वयक्तिक पातळीवर देखील टीका होत असल्याचं चित्र आहे.
भुजबळांना काहीच माहित नाही, मग कशाला केस पांढरे केलेत, असा सवाल मनोज जरांगे यांनी केलाय. भुजबळांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर देखील जरांगे पाटलांनी उत्तर दिलंय.
भुजबळांची आंदोलनं ही अशीच असतात वाटतं, ते बीडमध्ये अश्रू पुसायला गेले मग अंतरवाली सराटीमध्ये का आले नाहीत. भुजबळांचे केस पांढरे झालेत, पण त्याचा काहीच उपयोग नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.
बेदरे प्रकरणावर देखील मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या मुद्द्याला प्रत्युत्तर दिलंय. तो हल्ला आता झाला होता का? त्या गोळ्या पोलिसांनी झाडल्या होत्या.
बायकांना सुद्धा गोळ्या लागल्या. उलट माझा प्रश्न आहे की, जालन्यातील लोकांना अटक का केली असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय.
हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती. या सभेला दंगल सभा असं नाव द्यायला हवं, असं म्हणत जरांगे पाटलांनी ओबीसी सभेवर टीकास्त्र सोडलं.
माझे पाय तोडायला येत असतील तर या मी वाट बघतोय. माझे पाय तोडायला तरी याल, मी माझ्या समाजासाठी काहीही करायला तयार आहे. पण मी ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार, असा निश्चय जरांगे पाटलांनी यावेळी बोलून दाखवला.