परभणी, हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस;वीज पडून एकाच मृत्यू,दोघे जखमी
Unseasonal rain with gale in Parbhani Hingoli district; one dead, two injured due to lightning

परभणी;सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हिंगोली, परभणी शहरासह जिल्ह्याला विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले वादळी वारा विजेच्या कडकडात सुरु झालेल्या या पावसाचा जोर तब्बल दोन ता होता
,या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा पिकांना दिलासा मिळाला असला तरी कापूस आणि तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
, हिंगोली जिल्ह्यात वीज पडून एकाच मृत्यू झाला आहे, सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वादळी वारे मुसळधार पावसाला सुरुवात झाली, तब्बल तब्बल दीड ते दोन तास धुवाधार पाऊस सुरू होता,
मुसळधार पावसामुळे रात्री जनतेमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले, या पावसामुळे जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाच्या नियंत्रण कक्षात 72 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे .
मानवत परभणी सेलू तालुक्यात वाहणाऱ्या दुधना नदीला पाणी आले आहे, त्याचबरोबर शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, खरीप हंगामातील कापूस ,तूर पिकांचे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर रब्बी हंगामातील गहू हरभरा व जरी पिकांना दिलासा मिळाला आहे
सोमवारी पहाटे सुरू झालेल्या हिंगोली जिल्ह्यात सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात वारा आणि ढगांचा कडकडाटात त्यामुळे सुरू झालेले पावसामुळे आता हिवाळा सुरू आहे कि पावसाळा हेच कळेना ,
रविवार रात्रीच काही ठिकाणी सुरळक पावसाच्या सरी कोसळल्या मात्र मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, पुसेगाव, भागात पाऊस प्रचंड झाला ,विजयाचा प्रचंड कडकडाट होता ,
हिंगोली तालुक्यात परिसरात पावसाने हजेरी लावली काही भागात वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाली तर नाल्यांना , ओढ्यांना पाणी आले.
वसमत तालुक्यातील कवठा ,कुरुंदा ,हट्टा ,वसमत शहरात र सोमवारी पहाटे जोरदार पाऊस झाले ,
या पावसामुळे कापूस तूर या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव शिवारात रात्री पाऊस असल्याने राजू शंकर जायभाय गोजेगाव, विष्णू सिताराम नागरे, व बंसी गीते हे तिघे मित्रचिवे गाव लगत असलेल्या खंडोबा मंदिरात थांबले होते,
रात्री दोनच्या सुमाराचा नाही वीस कोसळल्याने मंदिराच्या दारात उभे असलेल्या राजू शंकर जायभाये याचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत
मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. नागरिकांना कधी उन्हाच्या झळा, तर कधी थंडीच्या कडाक्याचा सामना करावा लागत आहे.
त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. येत्या ३-४ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, रायगड, बीड, सातारा जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा अंदाज आहे.
त्याचबरोबर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता असून वाऱ्याचा ताशी वेग ३० ते ४० किमी असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील अकोला आणि बुलढाण्यात देखील आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रविवारी मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा तयार झाला होता. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत उकाडा जाणवत होता.
या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबई, ठाण्यासह उपनगरात अवकाळी पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.