पाहा आज कोनकॊणत्या जिल्ह्याला आस्मानी संकटाचे रेड अलर्ट
See the red alert of sky crisis in any district today

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आजही अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, बीडसह काही भागांत पूरस्थिती कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राहुल गांधी मराठवाड्याच्या दौऱ्यावर ,भाजपने साडी नेसवलेल्या मामा पगारेंचा करणार सन्मान
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, “अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नका,” असा इशाराही देण्यात आला आहे.
मोदी सरकारला आव्हान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते क्षेत्र जमिनीवर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस पडत आहे.
हवामान विभागाने पुढील ४८ तास सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
यात मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रासह पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. मुंबई व पालघरमध्येही पहाटेपासून पावसाने जोर धरला असून अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे.
मराठवाड्यातील शेतजमिनी तळ्यांत रूपांतरित झाल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरांना वेडा पडला असून घरांमध्ये पाणी शिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
राहुल गांधी चार देशांच्या दौऱ्यावर
अनेक ठिकाणी ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परिणामी रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जाहीर करण्यात आले आहेत.
ट्रम्प म्हणतात तेल खरेदी बंद करा,मात्र अडाणी-अंबानी प्रेमापोटी ते करायला तयार नाहीत
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
– रेड अलर्ट – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा
– ऑरेंज अलर्ट – रत्नागिरी, नाशिक, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा
देशभक्त सोनम वांगचुक यांना अटक करता, पाकिस्तानसोबत निर्लज्जासारखी मॅच खेळताय, हीच का देशभक्ती?
– यलो अलर्ट – नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम, सांगली, सोलापूर, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा
गेल्या ८ ते १० दिवसांपासून मराठवाडा, सोलापूर, विदर्भ, नांदेड परिसरात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतातील पीक आडवे झाले असून बळीराजाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत. अनेक घरात पाणी घुसल्याने संसारोपयोगी वस्तू नष्ट झाल्या आहेत. जनावरे वाहून गेली आहेत.
त्यामुळे आता सावरायचे कसे ? असा प्रश्न पूरग्रस्तांसमोर उभा आहे. अनेक विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे वाहून गेली असून भविष्य अंधारमय झाले आहे. अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून अनेकांच्या संसाराची वाताहात झाली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू वाहून गेल्याने जेवण कसे करायचे असा प्रश्न अनेक घरांमध्ये आहे.
हिंगोलीत कयाधू नदीला पूर आला आहे. या पुरामुळे नदीकाठची शेकडो एकर जमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. गावात पाणी शिरल्याने दाणादाण उडाली आहे.
बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत सकाळी ८ वाजेपर्यंत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे एका दिवसात सर्वाधिक १४३ मिमी पाऊस झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यांत जोरदार पाऊस झाल्याने तीन गावे पाण्याने वेढली गेली. वसमत तालुक्यातील चौंधी बहीरोबा आणि कळमनुरी तालुक्यातील बिबथर व कोंधूर दिग्रस या गावांचा मुसळधार पावसामुळे संपर्क तुटला आहे.
मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले आहे. अनेक सखल भागात पाणी शिरले असून बीडचे ग्रामीण पोलीस ठाणे पाण्यात गेले आहे.
त्यामुळे तेथील कामकाज सकाळपासून बंद आहे. माजलगावच्या बडेवाडी जिल्हा परिषद शाळेतही पावसाचे पाणी साठल्याने शाळेला तळ्याचे स्वरूप आले आहे.
लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले की, रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली असून रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही पाण्याखाली गेलेले पूल आणि रस्ते बंद केले आहेत. मांजरा नदी धोकादायक पातळीवरून वाहत आहे.
त्यामुळे पाऊस सुरू राहिला, तर नदीकाठच्या काही शेतांमध्ये पाणी घुसू शकते. बचाव पथके सज्ज असून अडकलेल्या गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाने जोरदार पावसामुळे काही रस्ते बंद केले आहेत. भूम आणि परंडा तालुक्यांत बचाव व मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) तैनात करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
२० सप्टेंबरपासून मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि पूरग्रस्त नद्यांमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, किमान नऊ जणांचा बळी गेला आहे आणि लाखो एकरांवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील प्रेरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक गावांना महापुराचा वेढा पडला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांमध्ये कंबरभर पाणी साचले आहे. चिखलातून सोयाबीन काढणे अशक्य झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे मान्य केले आहे. हा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठीचा मोठा पुरावा असून, दुसऱया पुराव्याची गरज नाही. त्यामुळे सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
पुण्यात आले असता शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेट्टी म्हणाले, की राज्याच्या अनेक पिके वाहून गेली असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे. परंतु, ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी सरकार बाकीच्याच गोष्टी करत आहे.
केंद्र सरकारने बिहारला मदत केली, पंजाबला मदतीची भूमिका घेतली. मात्र, महाराष्ट्राच्या बाबतीत निर्णय घेण्यामध्ये वेळकाढूपणा केला जात आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्याची वाट हे सरकार बघत आहे काय ? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राला गृहित धरण्याची चूक करू नये. अन्यथा, ते महागात पडेल.
ज्या शेतकऱ्यांनी पिकांसाठी कर्ज काढले आहे, त्यांचे कर्ज तात्काळ माफ करावे. तसेच ज्यांनी कर्ज न घेता खासगी सावकार किंवा इतर मार्गाने पैसा उचलला आहे, त्यांना बँक किती कर्ज देऊ शकते, तेवढी रक्कम नुकसानभरपाई स्वरूपात द्यावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे -शिक्षण शुल्कही माफ करावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.
महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वितरित करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या हाती मदतीची रक्कम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली. पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, “आम्ही शेतीत जाऊन परिस्थिती पाहिली आहे. सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. प्रत्येक वेळी संकट आले की केंद्राने मदत केली आहे,” असे त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात १० लाख २० हजार ९१७ एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. राज्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर म्हणजे ९४ लाख ७८ हजार ३०२ एकर क्षेत्र बाधित आहे. ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण होऊन ५९.७९ कोटींचा मदत निधी जाहीर केला आहे,
तर सप्टेंबरचे पंचनामे महिनाअखेरीस पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल. सोलापूर जिल्ह्याकरिता सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीपोटी ३९३.७९ कोटी रुपयांच्या अपेक्षित निधीची गरज भासू शकते, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.







