pune Crime News;वैष्णवी हगवणे प्रकरणात काही बडे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

pune Crime News; Some senior police officers under suspicion in Vaishnavi Hagavane case

 

 

पुण्याच्या हगवणे आत्महत्या प्रकरणात काही बडे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असून आता या अधिकारायवर कारवाईचा फास आवळला जाऊ शकतोय

 

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

 

हगवणे कुटुंबाच्या विरोधात त्यांच्या सुनांकडून वेळोवेळी आलेल्या तक्रारींची दखल पोलिसांनी घेतली नाही.

हे हि अवश्य वाचा BREAKING NEWS;मतदारांसाठी निवडणूक आयोगाने मोबाईल बाबत घेतला महत्वाचा निर्णय

वैष्णवीच्या बाळाचं अपहरण झाल्यानंतरही पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला. त्यामुळे पोलिसांनी एकप्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हगवणे कुटुंबीयांनीच पाठीशी घातल्याचा आरोप होतोय.

 

आता कामात हयगय करणाऱ्या पोलिसांवर सरकार कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला जातोय.

 

वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक झाली. यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली.

हे हि अवश्य वाचाBollywood News; Shahrukh Khan;ऑर्थर रोड जेलमध्ये असतांना शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान काय खात असे ?

पण ती केवळ १ मिनिटं १० सेकंदात आटोपली. एवढ्या संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी सव्वा मिनिटही न देणारे पुणे पोलीस टीकेचे धनी बनलेत.

 

मुळातच वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली. वैष्णवीचा जीव घेणाऱ्या हगवणे कुटुंबीयांनी मोठी सून मयुरीचाही अतोनात छळ केला होता.

हे हि अवश्य वाचाPolitical news;महायुतीत तणाव ;मला भाजपने पाडले आता तडजोड नाही,दादांच्या राष्ट्रवादीचा नेता भाजपविरोधात मैदानात

मयुरीनं नोव्हेंबर २०२४ मध्ये मारहाणीची पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली. गुन्हा दाखल होऊनही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी कारवाई केली नाही.

 

मयुरीच्या मारहाणीपासून वैष्णवीच्या आत्महत्येपर्यंत पुणे पोलिसांनी पावलापावलाला हलगर्जीपणा केलाय. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे वैष्णवीचं नऊ महिन्यांचं बाळाची सहा दिवस आबाळ झाली.

 

फरार झाल्यानंतर राजेंद्र हगवणे औंध रुग्णालयात होता, पण त्याला अटक करण्यात आली नाही.

 

20 मे रोजी बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कस्पटे कुटुंबीय वारजे पोलीस ठाण्यात गेले. आमची हद्द नाही, असं सांगत पीआय विश्वजीत कायंगडे यांनी तक्रार घेतली नाही.

 

बावधन पोलीस स्टेशनचे पीआय विजय विभुते यांनीही कस्पटे कुटुंबीयांची तक्रार घेतली नाही. निलेश चव्हाणविरुद्ध बाळाच्या अपहरणाचा गुन्हा नोंदला नाही

 

निलेश चव्हाणच्या बायकोची तक्रार गांभीर्यानं घेतली असती तर तो आज मोकाट नसता. निलेशच्या लॅपटॉपवरील अश्लील चित्रफितीत असणाऱ्या महिलांशी जबरदस्ती झाली का, याची पोलिसांनी चौकशी केली नाही.

 

पोलीस व सरकार हे हंगामी पद्धतीने ॲक्शन मोडमध्ये येत आहे का? वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

 

या प्रकरणातील पोलिसांचा तपास हलगर्जीपणाचा आहे. हलगर्जीपणा करणारे पोलीस आणि दुर्लक्ष करणारा महिला आयोग आहे, असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले.

 

वैष्णवीच्या अंगावर अनेक खुणा असूनही हगवणे कुटुंबीयांवर सौम्य कलमं लावल्याचाही आरोप केला जातोय.

 

वैष्णवीच्या कसेमध्ये संशय येण्यासारखा प्रकार आहे. कलमं लावली आहेत ती सौम्य प्रकारची आहेत. 19 खुणा वैष्णवीच्या अंगावर आहेत.

 

आमचं म्हणणं आहे ती हत्या आहे. त्याचे कलम लागणे गरजेचे आहे, 302 ब ची आम्ही मागणी करतोय. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय, असे शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी म्हटले.

 

महाराष्ट्रातील पोलीस खाते प्रत्येक चौकी पोलीस स्टेशन हे राजकारण्यांच्या दबावाखाली काम करतात.

 

हुंडाबळीच्या केसेस सुद्धा दबावाखाली चालवत असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा राजकारणात अडकत असतील तर ही राजकारणाच्या बाबतीत खूप चिंताजनक परिस्थिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *