महाभयंकर फेंगल चक्रीवादळ ;मुसळधार पावसासह बर्फवृष्टी होणार; हवामान खात्याचा अलर्ट

Severe Cyclone Fengal; Heavy rains and snowfall; Meteorological Department alert

 

 

 

डिसेंबर महीना सुरू व्हायला अवघे दोन दिवस बाकी आहेत. हवामान विभागानुसार, देशातील मैदानी भागात लवकरच कडाक्याची थंडी पडणार आहे.

येथे, फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. फेंगल चक्रीवादळामुळे देशातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे.

 

याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात 30 नोव्हेंबरपासून हिमवृष्टी आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

फेगल चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये दिसू शकतो. त्याच्या प्रभावामुळे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तापमानात मोठी घसरण होऊ शकते. ३ डिसेंबरपासून धुके वाढण्याची आणि तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या चक्रीवादळामुळे येत्या ४८ तासांत जोरदार वारे आणि पाऊस पडू शकतो.

 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात निर्माण झालेला दबाव गेल्या ६ तासांत ताशी 7 किमी वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकला.

 

शुक्रवारी चक्रीवादळ पाँडिचेरी आणि चेन्नईपासून 400 किमी अंतरावर आहे. ते लवकरच पुढे सरकण्याची आणि 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 55-65 किमी प्रतितास वेगाने

 

वाऱ्यासह कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान उत्तर तामिळनाडू-पुडुचेरी किनारे ओलांडून पुढे जाण्याची शक्यता आहे.

हावामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबर के 2 डिसेंबरपर्यंत तामिळनाडू, पाँडिचेरी, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काही भागांत मध्यम पाऊस होऊ शकतो. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनाही होऊ शकते.

 

तेलंगणा आणि केरळमध्ये 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान, किनारपट्टी आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये 1 ते 2 डिसेंबर दरम्यान पाऊस पडेल.

 

हवामान विभागाच्या सांगण्यानुसार, 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी उत्तर तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 नोव्हेंबर रोजी दक्षिण आंध्र प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते.

 

30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी केरळ आणि कर्नाटक, 30 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारी भागात आणि 1 डिसेंबर रोजी तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

राजधानी दिल्लीत शुक्रवारी आकाश साफ असेल. 1 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत सकाळच्या वेळी प्रमुख पृष्ठभागाचे वारे ताशी 4 किमी पेक्षा कमी वेगाने बदलत्या दिशेने वाहण्याची शक्यता आहे. सकाळी मध्यम धुकं जाणवू शकतं.

 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक 02 व 03 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. ‍ किमान तापमानात पुढील चोवीस तासात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 5 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. ‍

 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 29 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी

 

व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व दिनांक 06 ते 12 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

 

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

 

संदेश : पुढील पाच दिवस हवामन कोरडे राहण्याची शक्यता असल्यामूळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

 

लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून

 

वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

 

ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

हळद पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.

 

(हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत. हळदीच्या पानावरील ‍ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 10 मिली + 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

जोमदार वाढीसाठी हरभरा पिक सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे. पिक 20 ते 25 दिवसाचे असतांना पहिली कोळपणी करावी. हरभरा पिकास आवश्यकतेनूसार हलके पाणी द्यावे.

 

हरभरा पिकाची पेरणी करून 25 ते 30 दिवस झाले असल्यास 19:19:19 या खताची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

हरभरा पिकात मर, मूळकूज, मानमूज रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ज्या ठिकाणी 10 % पर्यंत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त भागात बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा 200 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

 

मागील काही दिवसात किमान तापमानात झालेल्या घटीमूळे, वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्यात. बागायती करडई पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 65 किलो यूरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे.

 

संत्रा/मोसंबी बागेत आंबे बहार धरण्यासाठी बागेचे पाणी तोडावे. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

 

डाळींब बागेत आंबे बहार धरण्यासाठी बागेचे पाणी तोडावे. डाळींब बागेत फळवाढीसाठी 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

 

भाजीपाला पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

 

कर्नाटक, आंध्रप्रदेश या दक्षिणात्य राज्यांना जवळ समुद्रामुळे परतीच्या पावसाचा फायदा होतो. तुती लागवडी साठी आणि वातावरणात आर्द्रता मर्यादित ठेवण्यासाठी पण त्या तुलनेत उत्तर कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात हवामान उष्ण व कोरडे आहे.

 

पहिल्या व दुसऱ्या रेशीम किटक वाढीच्या अवस्थेत 28 अं.से. तापमान व 85 टक्के आर्द्रता महाराष्ट्र राज्यात मर्यादित राहत नाही. त्यासाठी तुती पाने तोडणी थंड वेळेत करावी व साठवणीसाठी लिफ चेंबरचा वापर करावा.

 

त्यावर गोणपाट अच्छादन करून सतत पाण्याचा छिडकाव करावा म्हणजे फांद्याखाद्य सुकनार नाही. या उलट 10 टक्के जरी तुती पाने सुकली तरी किटकांना खाता येत नाहीत.

 

हिवाळ्यात तापमान 20 अं.से. च्या खाली गेल्यावर रूम हिटर किंवा कोळशाच्या शेगडीचा वापर करावा. पण संगोपन गृहात धूर होनार नाही याची काळजी घ्यावी.

 

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *