Political news;महायुतीत तणाव ;मला भाजपने पाडले आता तडजोड नाही,दादांच्या राष्ट्रवादीचा नेता भाजपविरोधात मैदानात
Political news; BJP has defeated me, now there is no compromise, the leader of Dadas NCP is in the fray against BJP

राहून राहून महायुतीत घमासान पाहावयास मिळत आहेत आता अजितदादांच्या नेत्याने भाजपविरोधात खुला मोर्चा उघडला आहे
विदर्भातील आदिवासी समाजाचे नेते आणि अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या धर्मराव बाबा अत्राम यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे.
मला यंदाच्या विधानसभा निवणुकीत पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोटच माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. नागपूर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते.
विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता आपण ताकद दाखवून देऊ असे म्हणत त्यांनी एकप्रकारे एकला चलो रे चे संकेत दिले आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर धर्मराव बाबा आत्राम हे आमदार बनले, पण त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यापूर्वीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते.
विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला भाजप व काँग्रेसकडून मदत केली गेली, निवडणुकीत पैसे पुरवले गेले. मात्र, तरी मी निवडून आलो असे आत्राम यांनी म्हटले.
तसेच, आता स्थानिक स्वराज्य स्थंस्थेच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाकडे जागेची भीक मागायची नाही. कोणाच्या कुबड्या घेऊन चालायचे नाही, गडचिरोली जिल्ह्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही,
हे हि वाचा ..Corona Maharshtra Update;कोरोनामुळे दोघांचा मृत्यू,;महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून सर्वाधिक रुग्ण
असा इशाराच त्यांनी दिलाय. मी कोणाचे ऐकणार पण नाही. पक्ष आमच्यासोबत असेल, गडचिरोलीत स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत सत्ता आणली जाईल, अशी भूमिका धर्माबाबा आत्राम यांनी मांडली. त्यामुळे, महायुतीत दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अहेरी मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यात विधानसभेची लढाई झाली.
त्यामुळे, या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.धर्मरावबाबांच्या कन्येनं बंड करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकिटही मिळवलं होतं. मात्र, या निवडणुकीत वडिलांकडून लेकीचा पराभव झाला.
हे हि वाचा ; BREAKING NEWS;मतदारांसाठी निवडणूक आयोगाने मोबाईल बाबत घेतला महत्वाचा निर्णय
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे दिवाळीपूर्वीच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून महायुती एकत्र लढणार असल्याचे त्यांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकत्रित निवडणुका लढवण्याचं सांगितलं जात असलं तरी स्थानिक पातळीवर नेते मंडळी वेगळा निर्णय घेत आहे.
हे हि वाचा ;pune Crime News;वैष्णवी हगवणे प्रकरणात काही बडे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात
त्याचाच एक भाग आज गडचिरोलीसंदर्भात धर्माराव बाबा आत्राम यांच्या भाषणावरुन दिसून आला. त्यामुळे, खरंच महायुती एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार की वेगळा निर्णय घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.