जैन समाजाने दिला महायुती सरकारला दिला इशारा,काढला स्वतःचाच पक्ष
Jain community warns Mahayuti government, withdraws its own party

राज्यामध्ये काही दिवसांपूर्वी कबुतर खाण्यांचा विषय सध्या जोर धरू लागला आहे. मुंबईमध्ये यावरून मोठ आंदोलनही झालं होतं. जैन धर्मियांनी कबुतरखाना बंद होऊ नये, अशी भूमिका घेतली होती.
आता शाळांमध्ये मराठी भाषा, राज्यगीत गायन अनिवार्य
दरम्यान न्यायालयानं मुंबईतला कबुतरखाना बंद राहणार असा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे अनेक कबुतरांचा मृत्यू झाला आहे व त्यांच्या आत्मशांतीसाठी
आज मुंबईत जैन समाजाकडून धर्मसभा भरवली गेली होती. या सभेमध्ये जैनधर्मिय मुनींनी एक पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे.
बिहार निवडणुकीत आश्वासन ;20 दिवसांत प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी
सनातनधर्मातर्फे मी इशारा देत आहे. महाराष्ट्रातले मराठी लोक कबुतरांना विरोध करत नाहीय. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी कबुतरांचा प्रश्न निर्माण केला आहे.
आम्ही आमचा धर्म विसरणार नाही. जैन धर्मातली लोक सर्वाधिक कर भरतात. आता आमचाही पक्ष असेल. आम्हीदेखील महापालिकेत आमचे उमेदवार उभे करणार आहोत.
इम्तियाज जलील जाहीर सभेत नितेश राणेंना म्हणाले छोटा चिंटू
कबुतरांची पार्टी पाहिजे. शिवसेनेतही वाघ होता, असं म्हणत असताना निलेश मुनींनी जन कल्याण पार्टी या पक्षाची घोषणाच केली आहे. पक्षाचं चिन्ह कबुतर असेन, असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे.
ही फक्त जैनांची पार्टी नाही, ही गुजराती मारवाडींची पार्टी, तसेच आमच्या जन कल्याण पार्टीत चादर-फादर सोडून सर्वांना एन्ट्री असल्याचं निलेशचंद्र विजय म्हणालेत.
कांद्यामुळे काँग्रेसचं सरकार गेलं होतं. कबुतरांमुळे महायुतीचं सरकार कोसळेलं असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
रेनकोट,छत्र्या कपाटात ठेवा ;पावसाचा परतीचा प्रवास सुरू
यावेळी शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांना उद्देशून “त्या बिचाऱ्या पागल झाल्या आहेत, त्यांना आवरा” असं निलेश मुनीनीं थेट एकनाथ शिंदेंना सुचित केलं आहे.
दरम्यान, या धर्मसभेमध्ये जैनमुनी कैवल्यरत्न महाराज यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की कबुतर शांत प्राणी आहे. आमचा धर्म दुसऱ्यासाठी मरायची शिकवण देतो.
परभणी जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर
रावणासमोर जटायू पक्षी आलेला. त्यामुळे पक्षी किती महत्त्वाचा आहे, हे सर्वांना माहिती आहे. एका पक्षासाठी श्रारामाने एवढं केलं आहे. तर या रामाच्या भूमीमध्ये असं व्हायला नको.
इथले डॉक्टरकर मूर्ख आहेत. एक दोनजण मेल्यानं काय होतं? दररोज सामान्य माणूस मरतो. त्याचा विचार सरकार करत नाही.असं धक्कादायक वक्तव्य या महाराजांनी केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा वार, मुंबईतील 7 कंपन्या अन् 8 भारतीयांवर बंदी
मंत्री भाजप आमदार मंगल प्रभात लोढा या धर्मसभेला उपस्थित राहिले नाही यावरुन ही सगळी सरकारची मिलीभगत असल्याचा दावाही यावेळी या जैनमुनींनी केला आहे.







