Indian Railways Breaking News;रेल्वे आरक्षणाच्या नियमात 1 जुलैपासून मोठे बदल

Indian Railways Breaking News;Major changes in railway reservation rules from July 1

bj admission
bj admission

 

 

रेल्वे मिनिस्ट्रीच्यावतीने एक मोठा निर्णय घेतला होता. रेल्वे मंत्रालयाने बुधवारी एक मोठा निर्णय घेतला. आता आधारकार्ड प्रमाणीकरण नसेल तर युजरला तत्काळचे तिकीट काढता येणार नाही.

हे सुद्धा वाचा !Maharashtra Monsoon Alert;पाच दिवस धोक्याचे ;हवामान विभागाचा मोठा इशारा

रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की तिकीट बुकींगसाठी आता नियमात मोठे बदल केले आहेत. 1 जुलै 2025 पासून हे नवीन नियम लागू केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट करुन ही माहीती दिली आहे.

 

रेल्वे मंत्रालयाने 10 जून 2025 रोजी एक सर्क्युलर सर्व झोनला जारी केले होते. तत्काल तिकीट सेवेचा लाभ योग्य प्रवाशांना मिळावा यासाठी आता युजरना त्यांचे आधारकार्डचे ई-व्हेरीफिकेशन करावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा !प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू कसा झाला? रेल्वेची धक्कादायक माहिती

त्यामुळे 1 जुलै 2025 पासून आयआरसीटीसीच्या वेबसाईट वा ऐपद्वारे केवळ आधार व्हेरीफिकेश केलेले युजरच तिकीट बुक करु शकणार आहेत. तसेच यानंतर 15 जुलै 2025 पासून Tatkal Booking साठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण देखील अनिवार्य करण्यात आले आहे.

 

या शिवाय रेल्वे तिकीट एजंट देखीस आता तत्काळ तिकीट बुकींग ओपन झाल्यानंतर ३० मिनिटांपर्यंत तिकीट बुक करु शकणार नाहीत. AC क्लाससाठी सकाळी 10:00 वा. ते 10:30वा.पर्यंत वेळ असणार आहे. तर नॉन एसी क्लाससाठी सकाळी 11.30 वाजेपर्यंत ही वेळ असणार आहे.

हे सुद्धा वाचा !वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास ‘ए ग्रेड’ मानांकन

IRCTC च्यामते देशात त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या 13 कोटीहून अधिक आहे. परंतू हैराण करणारी ही बाब आहे की देशात केवळ १० टक्के युजरच आधार व्हेरीफाईड आहेत.

 

त्यामुळे ‘तत्काल’ तिकीट बुकिंग प्रक्रियेला आणखी मजबूत बनवण्याच्या उद्देश्याने भारतीय रेल्वे   ने नियमांना कठोर करीत केवळ आधार व्हेरीफाईड आयआरसीटीसी अकाऊंटलाच Online Tatkal Ticket Booking करण्याची परवानगी दिलेली आहे.

हे सुद्धा वाचा !Breaking news of merger of two nationalists;संजय राऊतांचे ट्वीट,म्हणाले राज्यात भूकंपाची चाहूल?

Tatkal Ticket बुकिंगमध्ये दलालाचा सहभाग वाढल्यानंतर सरकारने बोगस आयडी वाल्या युजरवर अंकुश लावण्यास सुरुवात केली. आयआरसीटीसीने गेल्या एक वर्षात 3.5 कोटी बोगस यूजर आयडी ब्लॉक केल्या आहेत.

 

त्यानंतर या प्लॅटफॉर्मवर सिस्टमवरील ताण कमी झाला आहे. आता रेल्वे मंत्रालयाने या प्रकरणात मोठा बदल करीत आता आधार प्रमाणीकरणाचा नियम लागू केला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *