वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास ‘ए ग्रेड’ मानांकन
Vasantrao Naik Marathwada Agricultural University awarded 'A Grade' rating

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी तसेच अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांना भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीद्वारा प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकन प्राप्त झाले.
हे सुद्धा वाचा !NCP’s serious allegation;आमदार तोडपाणी साठी कामे अडविण्याचे काम करतात राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने दिनांक १६ मे २०२५ रोजी झालेल्या ४०व्या बैठकीत विद्यापीठास १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीसाठी अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली असून, या मूल्यांकनात विद्यापीठास उच्चांकी ‘३.२१’ गुण प्राप्त झाले आहेत.
हे सुद्धा वाचा !शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर विखे पाटलांचं मोठं वक्तव्य
ही अधिस्वीकृती विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनातील सातत्य व विस्तार सेवांतील कार्यक्षमतेची अधिकृत पावती आहे. अधिस्वीकृती समितीने २५ ते २९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान परभणी मुख्यालयासह लातूर, बदनापूर, अंबाजोगाई, धाराशिव, गोळेगाव (जि. हिंगोली), व चाकूर (जि. लातूर) येथील महाविद्यालयांना भेटी देत सखोल मूल्यांकन केले.
यावेळी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली सर्व महविद्यालयांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, सर्व विभागाच्या प्रमुखांनी, प्राध्यापकांनी आपले कार्य सादर केले.
हे सुद्धा वाचा !प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू कसा झाला? रेल्वेची धक्कादायक माहिती
या कामगिरीचा सखोल आढावा त्यावेळी समितीने घेतला होता. त्यावेळी विद्यापीठात शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्यात सातत्यपूर्ण प्रगती, शेतकरी हिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, तसेच भौतिक सुविधांचा प्रभावी वापर आदी बाबींचे समितीने विशेष कौतुक केले होते.
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व प्रभावी मार्गदर्शनामुळे हे मानांकन प्राप्त होऊ शकले. यानिमित्ताने कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, हे यश संपूर्ण विद्यापीठ समुदायाच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.
हे सुद्धा वाचा !तासिकातत्वावर प्राध्यापकांचे मानधन वेळेवर देण्यासाठी आता पोर्टल
राष्ट्रीय पातळीवर कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार क्षेत्रात विद्यापीठाचा प्रभाव अधिकाधिक वाढेल. या मानांकनामुळे विद्यापीठ विद्यार्थी केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी केंद्रित विस्तारकार्य आणि कर्मचारी केंद्रित प्रशासन राबविण्यास अधिक कटिबद्ध राहील.
या अधिस्वीकृतीमुळे विद्यापीठाची शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठा अधिक उंचावली असून, मराठवाड्यातील कृषी शिक्षणाला नवसंजीवनी लाभली आहे.
हे सुद्धा वाचा !Breaking news of merger of two nationalists;संजय राऊतांचे ट्वीट,म्हणाले राज्यात भूकंपाची चाहूल?
या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्र शासनाचे, कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती अॅड. माणिकरावजी कोकाटे, कृषि राज्यमंत्री . अॅड. आशिष जयस्वाल, कृषि परीषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य डॉ. राहुल पाटील,
विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य रमेशराव कराड, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य अभिमन्यू पवार आणि विद्यापीठ कार्यकारी परिषद सन्मानीय सदस्य विठ्ठल सकपाळ, सुरज जगताप, प्रविण देशमुख, दिलीप देशमुख, आदिती सारडा, भागवत देवसरकर, डॉ. कौशिक बॅनर्जी,
हे सुद्धा वाचा !Shiv Sena Thackeray-MNS will come together;दोन ठाकरे एकत्र येण्याच्या हालचालींना वेग, मनसेकडून पहिली अट
डॉ. व्ही. एम. मायंदे, कृषि परिषदेचे सदस्य विवेक दामले, विनायक काशीद, जनार्दन कातकडे, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि) विकासचंद्र रस्तोगी (भाप्रसे), पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे (भाप्रसे), कृषि आयुक्त सुरज मांढरे (भाप्रसे), कृषि परिषदेचे सर्व संचालक आणि विद्यापीठाच्या विद्वत परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, यांनी दिलेल्या अनमोल सहकार्याबद्दल कुलगुरूंनी आभार मानले.
तसेच त्यांनी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर तसेच सर्व अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता,
हे सुद्धा वाचा !नैसर्गिक आपत्तीमुळे सौर ऊर्जेचे नुकसान;शेतकऱ्याचा मदतीसाठी टाहो
विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, शास्त्रज्ञ, प्रशासकीय आणि आर्थिक अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचेसह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी यांनी दिलेल्या महत्त्वाचे योगदानाचे कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले असून ही अधिस्वीकृती विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याची पावती असल्याचे ते म्हणाले.
हे सुद्धा वाचा !Corona Latest News Update;देशात कोरोनाचे थैमान सुरूच , 24 तासांत 7 मृत्यू, पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण
या मानंकानामुळे राष्ट्रीय स्तरावरील निकषांवर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, उद्यानविद्या, जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन इत्यादी शाखांतील पदवी, पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमांनी उत्कृष्ट गुणवत्ता सिद्ध केली आहे.
विद्यापीठात या गौरवामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून, माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ही अधिस्वीकृती विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक विश्वासार्हतेला बळकटी देणारी असून, विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण कृषि शिक्षणाच्या नव्या संधी खुल्या करणारी ठरणार आहे.