लाडक्या बहिणींमुळे महायुती सरकारची दमछाक !

The Mahayuti government is suffering because of its beloved sisters.

 

bj admission
bj admission

महायुतीकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली तेव्हापासून ही योजना चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीच्या पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत दर महिन्याला पात्र महिलेला दीड हजार रुपये दिले जातात.

 

मात्र निवडणुकीच्या धामधुमीमध्ये जाहीर करण्यात आलेली आणि जोरदार प्रचार करण्यात आलेल्या लाडक्या बहिणींना निधी देण्यामध्ये आता महायुतीची दमछाक होत आहे. महायुतीमधील मंत्री आता तक्रार करत असून यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत.

हे सुद्धा वाचा;ब्रेकिंग न्यूज;सुरक्षा नंबरप्लेट नसेल तर आरटीओ कडून कोणतीही सेवा पुरविण्यात येणार नाही

महायुतीमधील शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी लाडकी बहीण योजनेसाठी त्यांचा निधी घेतला जात असल्याची पुन्हा एकदा तक्रार केली आहे

 

यापूर्वी देखील सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेला दिला जात असल्याची तक्रार केली होती. आता पुन्हा एकदा संजय शिरसाट आक्रमक झाले आहेत.

हे सुद्धा वाचा;Vasantrao Naik Marathwada Agricultural University News;कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांचा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुपर ज्युरी म्हणून सन्मान

या खात्याचा 410 कोटींचा निधी वळवल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाला गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत यावर्षी 7,317 कोटी रुपयांच्या निधीची तूट आहे

 

सामाजिक न्याय विभागाचा निधी सलग दुसर्‍यांदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 410.30 कोटींचा निधी यापूर्वी वळवण्यात आला होता.

 

आताही तितकाच निधी या योजनेसाठी वळवण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 820 कोटी 60 लाख रुपये वळवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा;बांग्लादेश सरकारने नोटावरील मुजिबूर रहेमान यांचा फोटो काढून , हिंदू ,बौद्ध मंदिरांची प्रतिमा नोटेवर

या खात्याचे मंत्री आणि शिवसेनेचे शिलेदार संजय शिरसाट यांनी विभागाचा निधी योजनेसाठी वळवल्याप्रकरणी आगपाखड केली होती.

 

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थिती हाताळून अर्थमंत्री अजित पवार यांची पाठराखण केली. मात्र यावेळी पुन्हा एकदा तोच प्रकार घडल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

लाडकी बहीण योजनेमधील अपात्र महिलांना निवडणुकीनंतर योजनेतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आता सरकारी नोकरी असून देखील अर्ज दाखल केलेल्या महिलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा;Corona Latest News Update;देशात कोरोनाचे थैमान सुरूच , 24 तासांत 7 मृत्यू, पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण

त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचे समोर आले. तसेच यामुळे सरकारच्या तिजोरी अपात्र महिलांना पैसे दिल्याने अधिकचा भार पडला आहे.

 

यामध्ये आता शेवटचा हप्ता या अक्षय तृतीयानंतर देण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता जून महिना सुरु झाला तरी अद्याप लाडक्या बहिणींना देण्यात आलेला नाही.

हे सुद्धा वाचा;Petrol-Diesel Rate News;देशात जनतेकडून 1 लीटर पेट्रोल-डिझेलवर सरकार किती कमवते

याबाबत महिला कल्याण व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारला असता लवकरच दिला जाईल असे उत्तर त्यांनी दिले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ओवाळणी देताना महायुती सरकारची दमछाक होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *