अजित दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांचा सरकारला गंभीर इशारा

Rohit Pawar warns government over Ajit Dada's plane crash

 

 

अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या घटनेनंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अजित दादांच्या विमान अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.

 

राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत.

‘लालपरी’ची चाके थांबणार?

अजित दादांच्या विमान अपघातानंतर मिळालेला ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता यावरून रोहित पवार यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

ब्लॅक बॉक्सच्या मुद्द्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘ब्लॅक बॉक्सचा फोटो आमच्याकडे आलेला आहे. तो कसा आहे? किती जळालेला आहे याचीही माहिती आमच्याकडे आहे.

 

केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय याची कसा तपास करते याची आम्ही वाट पाहत आहोत. अधिवेशनाच्या निमित्ताने मी सरकारमधील लोकांना सांगू इच्छितो की,

मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द ,काय म्हणाले इम्तियाज जलील

आम्ही आतापर्यंत फक्त 20 ते 30 टक्के माहिती दिली आहे. आमच्याकडे आणखी 70 टक्के माहिती आहे. त्यामुळे तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि जर त्यात काही काळंबेरं झालं तर सरकारला महागात पडेल.’

 

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशी अहवालावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की,

‘लालपरी’ची चाके थांबणार?

‘अजित पवार पवार यांच्या विमान अपघाताचा 28 फेब्रुवारी आधीच प्राथमिक अहवाल येणार आहे. अजित पवार यांच्या विषयी दोन दिवसांपूर्वी सिविल एव्हियेशियने स्पष्ट स्वरुपात प्रसिद्धीपत्रक जारी केले असून

 

त्यात माहिती दिली आहे.’ त्यामुळे आता या अहवालातून नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अजित पवारांच्या विमान अपघात :रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशी अहवालावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘तपासात थातूर मातून माहितीपेक्षा काही प्रमाणात सविस्तर माहिती दिली गेली तर तपास योग्य दिशेने जात आहे असं आम्ही समजू. मात्र उगाचचं काहीतरी द्यायचं म्हणून दिलं तर मग मराठी माणूस काय आहे ते दाखवावं लागेल.’

 

 

Related Articles