इस्रायल-इराण युद्ध;इराण वरचढ ,भारताला मोठी झळ बसणार
Israel-Iran war; Iran prevails, India will suffer a big blow


गेल्या सात दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरु आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर क्षेपणास्त्रं डागली जात आहेत. इराण अण्वस्त्र तयार करण्याच्या जवळ पोहोचल्यानं इस्रायलनं त्यांच्यावर हल्ले सुरु केले आहेत.
इराण अण्वस्त्र संपन्न झाल्यास आमच्यासाठी अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती इस्रायलला आहे. त्यामुळे इस्रायलनं ऑपरेशन रायझिंग लाईनच्या अंतर्गत इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांवर हल्ले सुरु केले आहेत.
दोन्ही ठाकरे एकत्र आलयास किती शक्ती वाढणार ?
प्रत्युत्तरादाखल इराणनंदेखील ऑपरेशन ट्रू प्रॉमिस राबवत इस्रायलवर क्षेपणास्त्रं डागली आहेत. यानंतर आता इराण संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवण्याच्या तयारीत आहे.
जगाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या असलेल्या होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचं वर्चस्व आहे. आखाती देशांमधून या एकमेव मार्गानं जगातील बहुतांश देशांना खनिज तेलाचा पुरवठा होतो.
“या” जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट, शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर
इस्रायलविरुद्धच्या युद्धात अमेरिका शत्रू देशाच्या बाजूनं उतरल्यास जगातील सगळ्यात महत्त्वाचा सागरी मार्ग असलेली होर्मुज सामुद्रधुनी बंद करु, असा थेट इशारा इराणनं दिलेला आहे.
होर्मुज सामुद्रधुनीतून जगातील २६ टक्के तेल व्यापार चालतो. इराणनं हा मार्ग रोखल्यास त्याची झळ अमेरिका, युरोपियन देशांसह भारतालादेखील बसेल. होर्मुजमधून होणारा व्यापार बंद करण्याचा इशारा इराणकडून देण्यात आलेला आहे.
इराण-इस्त्रायल युद्धाचा भडका;पाकिस्तानमध्ये 3 मोठे ब्लास्ट, काय आहे प्रकरण ?
‘अमेरिका इस्रायलच्या बाजूनं युद्धात उतरल्यास अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांवर दबाव टाकण्यासाठी, तेल व्यापारात बाधा आणण्यासाठी होर्मुजचा रस्ता बंद करेल,’ अशी थेट धमकी इराणचे खासदार अली याज्दिखाह यांनी गुरुवारी दिली आहे.
आणखीन एक मोठा विमान अपघात टळला
होर्मुजच्या सामुद्रधुनीमुळे ओमान खाडी आणि अरबी समुद्र जोडले जातात. एका ठिकाणी तर ही सामुद्रधुनी अतिशय अरुंद आहे. तिकडे समुद्री मार्गाची रुंदी केवळ २१ मैल आहे.
याच्या दोन्ही दिशांना दोन मैल रुंद शिपिंग लेन आहे. याच भागात इराण जलमार्ग बंद करु शकतो. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जगाच्या तेल व्यापाराची जवळपास २६ टक्के वाहतूक चालते.
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या अनुदानात 100 कोटींचा घोटाळा,21अधिकाऱ्यांचे निलंबन
त्यामुळे सामरिकदृष्ट्या हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. या मार्गात कोणत्याही बाधा निर्माण झाल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम जागतिक खनिज तेल बाजारावर होतील.
होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा इराणनं अनेकदा दिलेला आहे. पण व्यावहारिक दृष्टीनं ही सामुद्रधुनी बंद केली जाऊ शकत नाही. पण इराण हा व्यापारी मार्ग अतिशय धोका बनवण्याचा प्रयत्न करु शकतो. त्यामुळे तेलाच्या वाहतुकीत अनेक अडथळे येऊ शकतात.
इराण-इस्त्रायल युद्धाचा भडका;पाकिस्तानमध्ये 3 मोठे ब्लास्ट, काय आहे प्रकरण ?
१९८० च्या दशकात इराण-इराक युद्धादरम्यान इराणनं तेल टँकर आणि तेल लोडिंग सुविधांना बॉम्बनं लक्ष्य केलं होतं. त्यांच्यावर क्षेपणास्त्रं डागण्यात आली. यासाठी चिनी बनावटीच्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला गेला होता.
तेलाचे टँकर रोखण्यासाठी, तेल वाहतूक विस्कळीत करण्यासाठी स्पीडबोटींचा उपयोग केला गेला. यामुळे होर्मुजमार्गे होणारी संपूर्ण वाहतूक थांबली नाही. पण ती बऱ्यापैकी बाधित झाली.
सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला सुनावले,म्हणाल्या अजूनही उशीर झालेला नाही’
होर्मुजची सामुद्रधुनी भारतासाठीही महत्त्वाची आहे. कारण याच मार्गानं भारताला दररोज तेल पुरवठा होतो. हा मार्ग बंद झाल्यास भारताचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. भारतात दररोज ५.५ मिलियन बॅरल तेल वापरतो.
महविकास आघाडी फुटणार ?संजय राऊत म्हणतात ;राज्यात दोनच समविचारी पक्ष
यातील १.५ मिलियन बॅरल तेल याच मार्गानं येतं. त्यामुळे होर्मुज मार्ग बंद झाल्यास भारताला प्रचंड नुकसान सोसावं लागू शकतं. इंधनाचे दर गगनाला भिडून महागाईचा आगडोंब उसळू शकतो.









