भुजबळांनी दिला अजितदादांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा;कोणत्या पक्षात जाणार ?
Bhujbal resigned from Ajit Dad's NCP; which party will he join?

नांदगाव मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी मी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा समीर भुजबळ यांनी केली आहे. समीर भुजबळ यांनी
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राजीनामा दिला आहे. तसेच येत्या 28 तारखेला मी उमेदवारी दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नांदगाव मतदारसंघामध्ये विकास खुंटला आहे. विकासाची अनेक कामे प्रलंबित आहेत. विद्यमान आमदार आल्यानंतर मतदारसंघामध्ये दुरावस्था झाली असल्याची माहिती समीर भुजबळ यांनी दिली आहे.
नांदगाव मतदारसंघामध्ये अतिशय भयभीत वातावरण असल्याचे समीर भुजबळ म्हणाले. जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्यामुळं दुसरा
काहीतरी निर्णय घ्यावा असी कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यामुळं मी निवडणूक लढवण्याचा निर्णय गेतल्याचे समीर भुजबळ यावेळी म्हणाले.
साधारण वर्षभरापूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्याकडे सुपूर्त केली होती. ही जबाबदारी पार पडत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण संघटन मजबुतीने उभे केले.
यामध्ये जिल्हाध्यक्ष पासून बुधपर्यंत संघटनेची बांधणी आपण केली. मात्र भुजबळ कुटुंबीयांच्या ऋणानुबंध असलेल्या नांदगाव मध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे.
गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातले वातावरण अतिशय दूषित झालेले असून येथील नागरिक भयभीत आहे. नांदगाव मधील कार्यकर्ते पदाधिकारी आणि
नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबतली कैफियत आपल्यासमोर मांडली होती. नांदगाव मधील नागरिकांची वाढत असलेली मागणी आणि नांदगाव मधील दहशतीचे वातावरण बदलण्यासाठी
या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्ष पदाचा मी राजीनामा देत आहे. तो आपण स्वीकारावा अशी नम्र विनंती आपण आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे.
छगन भुजबळ यांचे पुतणे तथा माजी खासदार समीर भुजबळ हे इच्छुक आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
तसेच त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर आरोप करत आपण नांदगावमधून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपण 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार,
अशी माहिती समीर भुजबळ यांनी यावेळी दिली. विशेष म्हणजे आपण अपक्ष लढणार असल्याची घोषणा समीर भुजबळ यांनी केली.
“गेले अनेक दिवस मी या मतदारसंघात दौरे करत होतो. पंकज भुजबळ यांनी 10 वर्ष इथे काम केलं. आमचं संघटन इथे मजबूत आहे. गावपातळीवर आमचं संघटन आहे.
मी 2009 मध्ये खासदार असताना देखील मी पक्षाचे चिन्ह गावपातळीवर पोहोचवण्याचे काम केले. नाशिकमध्ये अनेक विकासात्मक कामे केली.
मुंबई-नाशिक हायवे, उड्डाणपूल, एअरपोर्ट, बोटॅक्लब या सारखे अनेक कामे केली. नाशिकला नावारूपाला आणण्याचे काम केले. विकासाचे काम सातत्याने केले.
मुंबई नाका येथे आशिया खंडातील सर्वात मोठा पुतळा बसवला. किकवी धरणाला मंजुरी मिळवून देण्यात माझा मोठा वाटा आहे”, असा दावा समीर भुजबळ यांनी केला.
“मंत्री छगन भुजबळ 1985 पासून आमदार आहेत. मला आमदार व्हायलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा नाही. मी आजही मुंबई प्रदेश अध्यक्ष आहे. आमदार होण्याची इच्छा आहेच असे नाही.
मात्र नांदगावची जी परिस्थिती आहे ती भयानक आहे. या ठिकाणी 10 वर्षात पंकज भुजबळ यांनी केलेल्या कामांना खीळ बसली होती. युतीचे सरकार आहे.
नांदगावमध्ये सुद्धा संधी मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध करून दिली होती. नांदगावमध्ये पाण्याचा प्रश्न आजही ज्वलंत आहे”, असं समीर भुजबळ म्हणाले.
“महिना भरापासून आमची शहरात स्वच्छता मोहीम सुरू होती. विद्यमान आमदारांनी इथले वातावरण भयभीत केले आहे. कोणी काही बोलायला गेलं तर लोक म्हणतात गपचुप येऊन बोल.
म्हणून आपण सुद्धा उमेदवारी करायला पाहिजे अशी कार्यकर्त्यांनी भूमिका आहे. युती धर्मामुळे त्यांना ती सीट गेली. नांदगाव भयमुक्त करण्यासाठी निवडणूक लढली पाहिजे अशी भावना आहे.
युती धर्मात अडचण येऊ नये यासाठी मी माझा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठवला आहे. येणाऱ्या 28 तारखेला नांदगावमधून फॉर्म भरणार”, अशी भूमिका समीर भुजबळ यांनी मांडली.