ईव्हीएम घोटाळ्यांनी युक्त निवडणूक असल्याने ही निवडणूक रद्द करण्यात यावी
This election should be cancelled as it is fraught with EVM scams.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला पार पडली आणि त्यानंतर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाले. २३ नोव्हेंबरच्या निकालात महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत.
यानंतर या निकालांमध्ये काहीतरी गडबड आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी संख्येबाबत सविस्तर पोस्ट लिहून फरक विचारला आहे. तर दुसरीकडे एका माजी आमदाराने विधानसभा निवडणूक निकाल ईव्हीएम घोटाळायुक्त आहे असा आरोप केला आहे.
महायुतीतल्या कुठल्या पक्षांना किती मतं मिळाली
भाजपा -१३२ आमदार
शिवसेना (एकनाथ शिंदे)- ५७ आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ४१ आमदार
मित्रपक्ष -९ आमदार
कन्नडची निवडणूक आणि त्या ठिकाणी झालेली मतमोजणी याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच प्रश्न या मतदार संघातही आहेत. ईव्हीएम संदर्भातल्या प्रश्नांसाठी मी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली.
येत्या काळात ईव्हीएमच्या संदर्भात अनेक गोष्टी आगामी काळात समोर येतील. कारण अनेक गोष्टी या मानवी चुका झाल्या आहेत म्हणून समोर येत आहेत.
आमचं लिहितांना चुकलं आणि दुरुस्त केलं हे पुढे येतं आहे. मतदानाच्या दिवशी मोजणी सुरु असताना जी आकडेवारी पत्रकारांना देण्यात आली ती नेमकी वाढली कशी?
त्यावर हे उत्तर देण्यात आलं की सुरुवातीच्या संख्या चुकल्या होत्या आणि आम्ही त्या आता दुरुस्त केल्या. निवडणूक आयोगाकडून संख्या देताना इतका हलगर्जीपणा कसा होतो? हा पोरखेळ झाला आहे. असं हर्षवर्धन जाधव यां नी म्हटलं आहे.
“येत्या काही दिवसांमध्ये राज्यात हे प्रश्न चर्चेत येतील. ही निवडणूक आणि निकाल ईव्हीएम घोटाळा युक्त असलेली निवडणूक आहे. ह्युमन एररचं कारण सांगितलं जातं आहे जे असू शकत नाही.
कारण हा निवडणूक आयोग आहे. चौपाटीवर बसून चूक झाली असं सांगण्यात येण्याइतकं सोपं नाही. घोटाळा कुठे झाला हे शोधावं लागेल.
ईव्हीएम घोटाळ्यांनी युक्त निवडणूक असल्याने ही निवडणूक रद्द करण्यात यावी. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे ही माझी मागणी आहे.” असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांचा दारूण पराभव झाला आहे. यानंतर अनेकांनी ईव्हीएम यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
शरद पवार यांनी ईव्हीएमच्या आरोपवार माहितीशिवाय भाष्य करण्यास नकारल दिला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे सातत्याने ईव्हीएम यंत्राबाबत विविध माहिती पुढे आणत आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीचे ते मोठ्या मताधिक्याने कसे निवडून आले, याबाबत माहिती दिली होती. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड होऊ नये, म्हणून त्यांनी त्यांची टीम कामाला लावली होती. आता त्यांनी महाराष्ट्रातील इतर ठिकाणी झालेल्या गोंधळाबाबत माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते, मुंब्रा-कळवा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी दिली आहे.
या मतदारसंघातील तळनेर नावाच्या गावात एकूण मतदार ३९६ आहेत आणि गावात ३१२ जणांनी मतदान केले होते. मात्र उमेदवारांना पडलेली मते दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मतदान झाले ३१२, मतमोजणीत निघाले ६२४
“३१२ जणांनी मतदान केले असताना शिवसेना (UBT) – १९४, शिवसेना (शिंदे) – ३२६, अपक्ष (हर्षवर्धन जाधव) – १०४ असे मतदान झाले आहे. या तीनही उमेदवारांच्या मतदानाची बेरीज ६२४ इतकी होते. EVM वर मुळीच शंका नाही पण या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? लवकरच हे उघडकीस आणू!”, अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
याबरोबरच जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांत आलेल्या काही बातम्या शेअर केल्या आहेत. द वायरने दिलेल्या बातमीनुसार, महाराष्ट्रात ५ लाख ४ हजार ३१३ अधिकचे मतदान दाखविण्यात आले आहे.
प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदान यात तफावत असल्याचे या बातमीत म्हटले गेले. आव्हाड यांनी ही बातमी शेअर करत निवडणूक आयोगाला यावर स्पष्टीकरण देण्याचे आव्हान दिले आहे.
दुसरीकडे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही ईव्हीएमवर शंका घेतली आहे. “गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का?”, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
“नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो.
निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं – काय खोटं हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे?
की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत”. असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान रोहित पवार यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तसेच त्यांनी नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच असल्याबद्दल शंका उपस्थित केली आहे.
निवडणूक आयोग नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? असा प्रश्न विचारत रोहित पवारांनी आकडेवारी असलेली यादी देखील सोबत दिली आहे.
रोहित पवार एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी?
एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो”. यासोबत त्यांनी विजेत्या उमेदवारांची नावे आणि त्यांना मिळालेली मते देखील दिली आहेत.
पुढे रोहित पवारांनी निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मिळण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं – काय खोटं हे सांगायला तयार नाही.
आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत…तरी आयोग जनभावना लक्षात घेऊन लवकरच स्पष्टीकरण देईल, ही अपेक्षा!”.
राोहित पवारांनी दिलेल्या यादीमधे शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपाच्या विजयी उमेदवारांचा नावे आणि त्यांना मिळालेली मते देण्यात आली आहेत.
यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सुहास कांदे – १३८०६८ , माणिकराव कोकाटे – १३८५६५ , नरहरी झिरवाळ – १३८६२२ , हिरामन खोसकर – ११७५७५, नितीश पवार ११९१९१, दिलीप बनकर – १२०२५३, राहुल ढिकले १५६२४६, दादा भुसे – १५८२८४, दिलीप बोरसे – १५९६८१, देवयानी फरांदे – १०५६८९ आणि डॉ. राहुल आहेर – १०४८२६ या उमेदवारांचा समावेश आहे.