Will Dhananjay Munde retire from politics?;धनंजय मुंडे यांनी घेतला मन:शांतीचा निर्णय

Will Dhananjay Munde retire from politics?; Munde takes a decision for peace of mind

 

 

आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे फारसे चर्चेत नाहीयेत. संतोष देशमुख यांच्या हत्येत त्यांच्या जवळची व्यक्ती वाल्मिक कराड याचे नाव आल्याने

 

त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. याच काळात मुंडे यांना आरोग्यविषयक समस्यांनाही तोंड द्यावे लागले. त्यांना बेल्स पाल्सी हा दुर्मिळ आजार झाला आहे.

 

असे असतानाच आता धनंजय मुंडे हे नाशिकच्या विपश्यना केंद्रात विपश्यना करत असल्याची माहिती आहे.

 

देशमुख हत्या प्रकरणात कराड मुळे राजीनामा द्यावा लागलेले धनंजय मुंडे आता राजकीय नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे हे मागील आठ दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्रात विपश्यना घेत असल्याची माहिती धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडेंचं नाव वाल्मिक प्रकरणात आलं होतं. त्यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होते.

 

त्यांच्याजागी मंत्रीपदाची माळ भुजबळांच्या गळ्यात पडली. त्यामुळे मुंडे काहीसे नाराज होते. त्यामुळेच त्यांनी मन:शांतीसाठी विपश्यनेचा मार्ग निवडला.

 

मात्र या काळात प्रचंड मनस्ताप झाल्याने धनंजय मुंडे यांनी इगतपुरी येथील सुप्रसिध्द विपश्यना केंद्र येथे जाऊन मन:शांती घेण्याचा निर्णय घेतला

 

असं त्यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आल आहे. आठ दिवसापासून ते त्या ठिकाणी ध्यानधारणा करत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

 

सलग दहा दिवस त्यांचा हा कार्यक्रम असल्याचे समजते त्यापैकी आठ दिवस पूर्ण झाले असून ते आपली ध्यान साधना पूर्ण करून दोन तारखेला पुन्हा कामाला लागणार असल्याचे त्यांचे कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख प्रकरणाबाबत आरोप करण्यात आले. यानंतर करुणा शर्मा यांच्याकडून होणारे वैयक्तिक आरोप,

 

मंत्रीपदातील कमी झालेला वावर अन् त्यानंतर गेलेल मंत्रीपद यानंतर धनंजय मुंडे यांनी आरोग्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली होती.

 

त्यानंतर काही दिवसातच त्यांना बेल्स पाल्सी या दुर्मिळ आजाराने ग्रासले. विविध उपचार घेऊनही अद्याप धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत हवी तितकी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांनी आता मनःशांतीकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनंजय मुंडे यांच्यापासून अंतर ठेवलंय की काय? अशी चर्चा रंगलीय. तसे पाहिलं तर नांदेड आणि परळीचे अंतर अत्यल्प आहे.

 

त्यामुळे यापूर्वी नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यक्रमात धनंजय मुंडे अग्रस्थानी असत. मात्र, संतोष देशमुख प्रकरणात राजीनामा झाल्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना खड्यासारखे बाजूला केले की काय? अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *