राहुल गांधीचा युद्धबंदीबाबत नरेंद्र मोदींवर मोठा आरोप
Breaking News Operation Sindoor; Gandhi makes a big allegation against Narendra Modi regarding ceasefire
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर संघर्ष पहायला मिळाला होता. भारतीय सशस्त्र दलांनी प्रथम ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता,
तसेच पाकिस्तानने केलेले हल्ले परतवून लावले होते. मात्र काही काळानंतर युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता यावर भाष्य करताना राहुल गांधी यांनी या युद्धबंदीबाबत केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
हे सुद्धा वाचा;Ladkya Bhaeen Yojana;लाडक्या बहीण योजना; ‘या’ महिलांना घेता येणार नाही योजनेचा लाभ
खासदार राहुल गांधी यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीबाबत केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. राहुल गांधींनी म्हटले की,
‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेच शरणागती पत्करली. भाजप-आरएसएसचे वैशिष्ट्य असे आहे की ते नेहमीच नतमस्तक होतात. पण जर देशात काँग्रेसचे सरकार असते तर कधीही शरणागती पत्करली नसती.’
हे सुद्धा वाचा;काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी आमदार भाच्याला फटकारले
राहुल गांधी यांनी भोपाळमधील भाषणादरम्यान म्हटले की, मी आरएसएस आणि भाजपला चांगले ओळखतो. जर त्यांच्यावर थोडासा दबाव आणला तर ते घाबरून पळून जातात.
त्यामुळे जेव्हा ट्रम्पने मोदीजींना इशारा दिला तेव्हा त्यांनी ट्रम्पच्या आदेशांचे पालन केले. स्वातंत्र्याच्या काळापासून त्यांना शरणागती पत्रे लिहिण्याची सवय आहे.’
हे सुद्धा वाचा;Big blow to Baba Ramdev;बाबा रामदेव यांना २७३ कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार?
आता राहुल गांधींच्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. भाजपकडून राहुल गांधींना काय उत्तर दिले जाते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली होती.
हे सुद्धा वाचा; महायुतीत खळबळ; शिंदेंचे सर्व मंत्री आणि अजित दादा यांच्यात तणाव
याअंतर्गत भारतीय सैन्याने १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तसेच पाकिस्तानच्या हवाई तळांवर हल्ले केले होते.
मात्र युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर भारत सरकारने हे जाहीर केले आहे की,ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले आहे, मात्र ते अद्याप संपलेले नाही.