काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी आमदार भाच्याला फटकारले
Congress leader Balasaheb Thorat reprimands MLA nephew

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
तांबे यांनी राहुल गांधी यांच्या भेटीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी तांबे यांना ‘बालिश’ म्हटलं आहे.
हे सुद्धा वाचा ,;ST’s Flexi Fare Scheme;एसटी ची फ्लेक्सी फेअर योजना ;आता प्रवाशांना कमी गर्दीत कमी भाडे
काँग्रेसने तांबे यांच्यासाठी खूप काही केले, पण ते अजूनही विचारपूर्वक बोलत नाहीत, असं थोरात यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींना भेटून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं.
हे सुद्धा वाचा ,;maharashtra corona alert;दोन दिवसांत कोरोनामुळे 21 जणांचा मृत्यू;सरकार ऍक्शन मोडमध्ये
तांबे म्हणाले होते की, “राज्यातल्या काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने राहुल गांधी यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना एक तासात भेटायला जाऊन दाखवावं.” तांबे यांच्या या टीकेवर बोलताना आता बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक शब्दांत फटकारलं आहे.
“सत्यजीत तांबे बोलले हे खरं आहे. एकतर आपल्या जीवनात ज्यांनी आपल्यासाठी काही केलं आहे ते ऋण कायम लक्षात ठेवले पाहिजेत. काँग्रेसने सत्यजीतसाठी खूप काही केलं आहे.
पण त्यांचं बोलणं अजूनही बालिश आहेत. त्यांनी जरा विचार करून बोलावं. ते आता स्वतंत्र आहेत पण काय बोलावं आणि काय नाही हे शिकलं पाहिजे,” असा हल्लाबोल थोरात यांनी केला आहे.
हे सुद्धा वाचा ,;Earthquake in Pakistan;पाकिस्तानमध्ये भूकंप ,जनतेत घबराट
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तांबे यांनी काँग्रेस नेत्यांना एक आव्हान दिले. ते म्हणाले, “प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने मला राहुल गांधींची अपाँइटमेंट घेऊन एक तासात त्यांना भेटून दाखवावं.
हे सोडा, कोणत्याही नेत्याने मला राहुल गांधी यांना फक्त फोन करून दाखवावा. अशा प्रकारचं नेतृत्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या जीवावर लढाई करायची?” असा प्रश्न तांबे यांनी विचारला होता.
दरम्यान माझा भाजप पक्ष प्रवेशाचा अजून काही विषय नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. जे लोक मला मार्गदर्शन करतात ते सांगतील मला कधी काय करायंच ते… सध्या अपक्ष आहे आणि अपक्षचं चांगलं आहे”,
हे सुद्धा वाचा ,;Ladkya Bhaeen Yojana;लाडक्या बहीण योजना; ‘या’ महिलांना घेता येणार नाही योजनेचा लाभ
असं सूचक वक्तव्य विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केलंय. ते एका मुलाखतीत बोलत होते. यावेळी सत्यजित तांबे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे होती.
सत्यजित तांबे म्हणाले, काँग्रेसची मला चिंता वाटते. ही चिंता प्रेमामुळे सुद्धा वाटते. माझे शेवटी त्या पक्षावर प्रेम आहे. कारण त्या विचारातून आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत.
हे सुद्धा वाचा ,;Sheikh Hasina News;बांग्लादेशात शेख हसीनाला मृत्यदंड?
मात्र, जेव्हा आम्ही पाहातो की, तेथे काहीच होत नाही. कोणीच सिरीयस नाहीये. देशाच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम सुरु आहे. देश एका बाजूला चाललाय. तुम्ही काहीतरी वेगळंच करताय.
हे कुठंतरी मनाला खटकतं. राजकारण म्हणून सुद्धा तुमचं धोरण नेमकं काय? शशी थरुर यांना अमेरिकेत बाजू मांडण्यासाठी पाठवण्यात आलं. काँग्रेसने लगेच पंतप्रधानांना पत्र लिहिलंय की,
काँग्रेसमधून कोण पाठवायचं हे तुम्ही ठरवणार का? आम्ही आमचे नावं देणार… हे त्यांचेच नावं देणार जे त्यांचे आजू बाजूचे लोक आहेत. हे त्यांचेच नाव देणार जे त्यांचं लांगुणचालन करतात.
हे सुद्धा वाचा ,;अजित पवारांकडून स्वतःच्याच मंत्र्याला कानपिचक्या
ते शशी थरुर यांना संधी देणार नाहीत. चांगले लोक आहेत, ज्यांचे विचार चांगले आहेत, त्यांचा दिल्लीतील काँग्रेसची चांडाळचौकडी द्वेष करते. त्यांचा तिरस्कार करते. मला वाटतं की, सगळ्यात चुकीची गोष्ट आहे असेही ते म्हणाले होते .