विमानाच्या चाकातून आग आणि धूर 250, हज यात्रेकरू बालंबाल बचावले
250 Hajj pilgrims escape unharmed after plane's wheels catch fire and smoke


गेल्या आठवड्यात ( गुरूवार 12 जून) अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताने सगळेच हादरलेत, 270 हून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला असून त्याची दहशत अद्याप लोकांच्या मनात असतानाच,
काल लखनऊ एअरपोर्टवरही एक मोठा अपघात टळला. खरंतर, सौदी अरेबियातील जेद्दाह येथून येणाऱ्या SV 3112 या विमानाचं लँडिंग होत असतानात,
हे सुद्धा वाचा;Corona Breaking News;कोरोनाची साथ ;रूग्णालयांना अलर्ट राहण्याचे आदेश
अचानक विमानाच्या चाकांमधून ठिणग्या उडाल्या तसेच धूरही येऊ लागला. या विमानात सुमारे 250 हज यात्रेकरू होते. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान सकाळी 6:30 च्या सुमारास लखनौला पोहोचले. लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवर उतरताच त्याच्या एका चाकातून ठिणग्या निघताना दिसल्या.
हे सुद्धा वाचा;इस्रायल-इराण युद्ध चिघळले तर हे गंभीर परिणाम शकतात
विमानतळ कर्मचाऱ्यांनी तात्काळ सतर्कता दाखवली आणि आपत्कालीन प्रक्रियेचे पालन करून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. पण प्रवाशांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा प्रचंड घबराट उडाली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विमानाला टॅक्सीवेवर परत ढकलण्यात आले. प्रवाशांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
हे सुद्धा वाचा;नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचं आमिष; पालकांना लाखोंचा गंडा
गेल्या आठवड्यात, गुरुवार (12 जून, 2025) अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला प्रचंड मोठा अपघात झाला. टेकऑफ करताच अवघ्या काही क्षणांतच हे विमान अहमदाबादमधील एका मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कोसळले.
या विमानात 242 प्रवासी होते, त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामधून अवघा 1 प्रवासी जिवंत वाचला, मात्र तो बराच जखमी होता, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला.
हे सुद्धा वाचा;इराणने पांढरा झेंडा फडकवला, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा नेतान्याहूंपुढे सिझफायरचा प्रस्ताव
धक्कादायक गोष्ट म्हणजे हा अपघात फक्त विमानापुरता मर्यादित नव्हता. ते विमान ज्या मेडिकल कॉलेजच्या परिसरात कोसळले, तेथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांनाही त्याचा फटका बसला, ज्यामुळे एकूण मृतांची संख्या 270 पेक्षा जास्त झाली आहे.
हा अपघात भारताच्या विमान वाहतूक इतिहासातील सर्वात दुःखद आणि भयानक घटनांपैकी एक मानला जातो. सरकारी संस्थांनी चौकशी सुरू केली आहे आणि प्राथमिक अहवालांनुसार,
तांत्रिक बिघाड हे अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे. या अपघातामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. या अपघातात ज्या प्रवाशांनी आपला जीव गमावला त्यांच्या अतिशय हृदयद्रावक कहाण्या सध्या समोर येत आहेत.