आजोबांनी वाढवलं टेन्शन; पार्थ पवार अडचणीत येणार?

Grandfather increases tension; Will Parth Pawar get into trouble?

 

 

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहारामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अडचणीत आले आहेत.

 

काँग्रेसमधील विविध नेत्यांकडून या प्रकरणावरून पार्थ पवार यांच्यासह अजित पवारांनाही लक्ष्य केलं जात आहे. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी पार्थ पवारांची पाठराखण केल्याने पक्षात संभ्रम निर्माण झाला होता.

पार्थ पवार प्रकरणात प्रदीर्घ काळानंतर अण्णा गाजले आणि कडाडले

आता अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडली असून थेट मुख्यमंत्र्‍यांकडे चौकशीची मागणी केली आहे.

 

शरद पवार यांनी म्हटलं की, “पुण्यातील जमीन व्यवहाराचे प्रकरण गंभीर असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

लाच घेताना तलाठीला रंगेहात अटक

एखादी गोष्ट गंभीर असल्याचं मुख्यमंत्री सांगत असतील तर त्याबाबत चौकशी करून वास्तव चित्र त्यांनी समाजासमोर ठेवलं पाहिजे. त्यामुळे ते काम त्यांनी करावं, अशी आमची अपेक्षा आहे,” असं पवार म्हणाले. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

दरम्यान, कुटुंबातील एका सदस्यावर जमीन गैरव्यवहाराचे आरोप झाल्याबद्दल पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र “प्रशासन, राजकारण, कुटुंब आणि कुटुंबप्रमुख या गोष्टींमध्ये फरक आहे.

‘व्हीव्हीपॅट नाही तर मतपत्रिकेवर मतदान घ्या ,मागणीची कोर्टाकडून गंभीर दखल

कुटुंबप्रमुख म्हणून म्हणाल तर आम्ही एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवल्या आहेत. माझा एक नातू हा अजित पवारांविरोधात उभा होता. अजित पवारांची पत्नी माझ्या मुलीविरोधात निवडणुकीत उभी होती,” असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

 

सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांची पाठराखण केल्याचं दिसून आलं होतं. “हे प्रकरण ऐकल्यानंतर मी सकाळीच पार्थ पवार यांना फोन केला आणि नेमका विषय काय आहे, हे विचारलं.

शेतकऱ्यांचा संताप निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

त्यावर, मी काहीही चुकीचं केलेलं नाही. माझ्या वकिलांशी बोलणं झालं आहे,’ असं पार्थ म्हणाले. जर त्यांचे वकिलांशी बोलणे झाले असेल, तर वकील याबाबत स्पष्टीकरण देतीलच,’ असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं.

 

दरम्यान, “पुण्यातील जमिनीचे प्रकरण नेमकं काय आहे, हे सरकारने स्पष्ट केलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं. जमीन सरकारी होती तर मग ती विकता येते का,

मातोश्रीवर ड्रोनद्वारे उद्धव ठाकरेंवर हेरगिरी ?

जर विकता येत असेल तर नियमाप्रमाणे व्यवहार झाला का आणि तहसीलदार म्हणतात की कागदपत्रांवर मी सही केली नाही, मग सहीशिवाय व्यवहार झाला कसा?” असे प्रश्न सुळे यांनी उपस्थित केले होते.

 

 

Related Articles