अजित पवारांकडून स्वतःच्याच मंत्र्याला कानपिचक्या
Ajit Pawar's insults to his own minister

काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना दिला आहे. कोकाटेंना अजून गोष्टी मनात ठेवायची सवय नाही, असंही ते म्हणाले.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का?”
हे सुद्धा वाचा…. !आता गुरुजींसाठी टेन्शनची बातमी ; ज्येष्ठ शिक्षकांचीही होणार ‘परीक्षा
असा सवाल करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना आणि शेतकरी मदतीसाठी आशेनं सरकारकडे पाहत असताना कोकाटे यांचं असं वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
“माणिकराव कोकाटेंना अजूनही गोष्टी मनात ठेवायची सवय नाही. आता मला जास्त महागात पडतंय. शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी बोलणं योग्य नाही. याबाबत मी मागेही त्यांना सांगितलं होतं.
हे सुद्धा वाचा…. !maharashtra corona alert;दोन दिवसांत कोरोनामुळे 21 जणांचा मृत्यू;सरकार ऍक्शन मोडमध्ये
शेतकरी हा बळीराजा आहे, आपला पोशिंदा आहे. सगळ्या गोष्टी आम्हालाही माहीत आहेत, आम्हीसुद्धा शेतकरी आहोत. परंतु काही गोष्टी बोलून का दाखवायच्या? मनात ठेवायच्या”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
एकीकडे ढेकळांच्या पंचनाम्याचं त्यांचं वक्तव्य चर्चेत असतानाच कोकाटे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारी टिप्पणी केली होती. “कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आणि मला हे खातं दिलंय”, असं ते म्हणाले.
हे सुद्धा वाचा…. !ज्योती मल्होत्रानंतर पुन्हा तिघां गुप्तहेराना महाराष्ट्रात अटक
कोकाटे यांच्या वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “मी असं काही बोललोच नाही” असं ते म्हणाले. “राज्यात बऱ्याच ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
फळबागांचं नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काही भागात कांद्याच्या पिकाचंही नुकसान झालं आहे.
हे सुद्धा वाचा…. !Sharad Pawar’s U-turn;शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याच्या मुद्यावर शरद पवारांचा यु टर्न
जेवढं नुकसान झालंय, त्यानुसार पंचनामे करण्यास सांगितलं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. हे नैसर्गिकच आहे.
सोयाबीन आणि कापसाचं पिक फारसं उरलेलं नाही. उभ्या असलेल्या फळबागा महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचे पंचनामे करणं गरजेचं आहे”, अशी सारवासारव त्यांनी केली.