मुसळधार पावसाचा इशारा

Warning of heavy rainfall

 

 

राज्यात एक जुलै ते आठ जुलैदरम्यान जोरदार पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिली, दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं पहायला मिळत आहे.

 

पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळाला आहे. येत्या 24 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

 

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढणार असून, मराठवाड्यात जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के; हिंगोली, परभणी, नांदेड हादरले

विदर्भात पुढील चार ते पाच दिवस चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यात साधारण तर काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

 

गोंदिया भंडारा , गडचिरोली जिल्ह्याला पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र 24 जुलैनंतर पावसात पुन्हा खंड पडू शकतो, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

राष्ट्रवादीतूनच सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सुद्धा चांगल्या पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भात कमी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

 

 

चिपळूण तालुक्यातील नायशी गावात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पावसाची दमदार सुरुवात झाली असून, सखल भागात त्यामुळे पाणी साचलं आहे. दरम्यान या पावसामुळे आता तालुक्यातील शेतीच्या कामाला वेग येणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर आणखी वाढू शकतो असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

हवामान विभागाने दिली पावसाची तारीख

दरम्यान पुन्हा एकदा मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचं जोरदार आगमन झालं आहे. मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसासोबतच वारं देखील असल्यामुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. जोरदार पाऊस सुरू आहे

 

 

Related Articles