नैसर्गिक आपत्तीमुळे सौर ऊर्जेचे नुकसान;शेतकऱ्याचा मदतीसाठी टाहो
Solar energy loss due to natural disaster; Farmers appeal for help


मानवत तालुक्यातील सावळी गावात २६ मे रोजी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे शेतकरी सतीश नारायण काळे यांच्या शेतात मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतील संरचना व सौरउर्जेचे उपकरणे यांचे नुकसान झाले.
हे सुद्धा वाचा;अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प -आणि टेस्लाचे मालक एलाॅन मस्क यांच्यात जुंपली
वादळी वाऱ्यामुळे झाडे पडली व सौर पंपाच्या यंत्रणेला मोठा फटका बसला. याशिवाय अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांवरही परिणाम झाला आहे. या घटनेनंतर शेतकऱ्याच्या विनंतीवरून दिनांक २८ मे रोजी पंचनामा करण्यात आला.
हे सुद्धा वाचा;Petrol-Diesel Rate News;देशात जनतेकडून 1 लीटर पेट्रोल-डिझेलवर सरकार किती कमवते
पंचनाम्यासाठी ग्रामस्थ श्रेयस काळे, नयन पाटील, सिध्देश्वर माने, मारुती काळे आणि इतर पंच उपस्थित होते. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून नोंद केली. पंचनामा अहवाल ग्रामपंचायत सावळीमार्फत सादर करण्यात आला आहे.
सतीश काळे यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून, तात्काळ मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.