सोने उच्चांकावरून 54,000 ने स्वस्त
Gold falls by Rs 54,000 from high

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका सर्वांनाच बसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धामुळे गॅसची मोठी टंचाई असून कच्चे तेलही संकटात आहे.
काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज
याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारही कोसळत आहे. सोने आणि चांदीच्या किमती या युद्धात उतरताना दिसल्या. इराण आणि अमेरिका युद्धाला 25 दिवस झाले आहेत.
मात्र, सोने आणि चांदीचे भाव काही वधारताना दिसत नाही तर उलट घसरतच आहेत. सोने आणि चांदीचे भाव कालपेक्षाही उतरले आहेत.
मुंबईतील 40 जणांनी केली इच्छामरणाची मागणी ,काय आहे कारण ?
28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाले आणि तेव्हापासून मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्सवर सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 23,000 रुपयांपेक्षा जास्त घसरला आहे. सोने आता 54,000 रूपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीची तर वाट लागली असून आता अर्ध्या किंमतीवर चांदी आली.
मंगळवारी ट्रेडिंग दिवशी 1,38,743 रुपयांपर्यंत सोन्याची घसरण झाली. याचा अर्थ असा की, या 25 दिवसांत सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 23,361 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
सोन्याच्या उच्चांकी दराबद्दल बोलायचे झाले तर, 29 जानेवारी रोजी सोन्याने वेगाने प्रति 10 ग्रॅम 1,96,093 रुपयांचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. चांदीचीही तिच स्थिती आहे. काल 22 कॅरेटचा भाव 1 लाख 28 हजारांपर्यंत होता. आजही या भागात घसरण होण्याचा अंदाज आहे.
चंद्राबाबू सरकारची बम्पर योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार बक्षीस
इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जागतिक बाजारपेठेवर बसत आहे. त्यामध्येच सोने आणि चांदीच्या किमती घसरताना दिसत आहेत. सोने आणि चांदीचे भाव कमी झाल्याने अनेकांनी खरेदी करण्यासही सुरूवात केली.
मागील काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ होत होती. या युद्धाच्या दरम्यान किमती कमी होताना दिसत आहेत.
जय पवारांची पत्रकार परिषद रद्द होण्याचे मोठे कारण समोर
फक्त सोने आणि चांदीलाच या युद्धाचा फटका बसला असे नाही. 28 फेब्रुवारी 2026 पासून युद्धाला सुरूवात झाली आणि तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारात अस्थिर झाल्या. सतत त्या वाढत आहेत.
कच्च्या तेलाच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्याकरिता रशियाकडून तेल खरेदी करण्यास अमेरिकेने जगातील अनेक देशांना सांगितले. युद्ध संपल्यानंतर पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत आहेत.
युद्धामुळे गॅस टंचाई आता मोबाईल नेटवर्कही गायब ?






