नवनीत राणांच्या मतदारसंघात भाजपचा प्लान बी तयार

BJP's plan B is ready in Navneet Rana's constituency

 

 

 

 

अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. विद्यमान खासदार नवनीत राणांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, त्या हाती कमळ घेणार का, याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.

 

 

 

 

राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लवकरच लागेल. १ एप्रिलला हा निकाल लागेल. त्यांच्या बाजूनं निकाल लागल्यास २ एप्रिलला राणा यांना भाजपकडून उमेदवारी घोषित केली जाईल. निकाल विरोधात गेल्यास भाजपनं प्लान बी तयार ठेवला आहे.

 

 

 

नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. निकाल विरोधात गेल्यास राणा यांना निवडणूक लढवता येणार नाही.

 

 

ही शक्यता लक्षात घेऊन भाजपनं पर्याय तयार ठेवले आहेत. प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज यांच्या नावाचा विचार सुरू आहे.

 

 

 

 

त्या मूळच्या अकोला जिल्ह्यातील आहेत. दिवंगत रिपब्लिकन नेते रा. सु. गवई यांच्या कन्या कीर्ती गवई यांच्यासह एका माजी आयएएस अधिकाऱ्याचं नावही विचाराधीन आहे.

 

 

 

 

त्यामुळे भाजपकडे अमरावतीसाठी तीन पर्याय तयार आहेत. राणा यांच्या विरोधात निकाल गेल्यास या तिघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.

 

 

 

अमरावती लोकसभेची जागा राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सोडण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली.

 

 

 

 

त्यामुळे नवनीत राणा या पुन्हा एकदा युवा स्वाभिमान पक्षाकडूनच लढणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. राणा भाजपमध्ये प्रवेश करतील आणि कणल चिन्हावर लढतील अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.

 

 

 

लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच, असं सूचक विधान राणा यांनी केलं होतं. त्यामुळे राणा भाजपच्या चिन्हावर लढतील या चर्चेला उधाण आलं होतं.

 

 

 

नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप आहे. राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर राणा आणि त्याच्या

 

 

 

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असला तरी महायुती, महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप तरी जाहीर झालेलं नाही. भाजपनं सर्वाधिक २३ उमेदवारांची घोषणा करत आघाडी घेतली आहे.

 

 

 

 

गेल्या निवडणुकीत भाजपनं २५ जागा लढवल्या. पैकी २३ जागा भाजपनं जिंकल्या. या २३ पैकी २२ जागांवर भाजपनं उमेदवारांची घोषणा केली आहे.

 

 

 

 

विद्यमान खासदारांच्या जागांचा विचार केल्यास भाजपनं उत्तर मध्य मुंबईतून उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.

 

 

 

 

मुंबईत भाजपचे एकूण ३ खासदार आहेत. त्यातील २ खासदारांचा पत्ता कट झाला आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी,

 

 

 

 

ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही. शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि कोटक यांच्या ऐवजी मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे.

 

 

 

 

शेट्टी, कोटेचा यांच्यानंतर पूनम महाजन यांचाही पत्ता कट होऊ शकतो. त्यांच्या जागी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना संधी मिळू शकते. महाजन यांच्या मतदारसंघात विधानसभेच्या ६ जागा आहेत.

 

 

 

 

आशिष शेलार यांचा वांद्रे पश्चिम मतदारसंघाचा समावेशही उत्तर मध्य मुंबईत होतो. शेलार २०१४ पासून वांद्रे पश्चिममधून निवडून येत आहेत.

 

 

 

 

 

दोन्ही वेळा ते २५ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. त्यामुळे महाजनांच्या जागी शेलार यांना संधी दिली जाऊ शकते.

 

 

 

 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडली. तेव्हापासून शेलार सातत्यानं उद्धव ठाकरेंना शिंगावर घेण्याचं काम करत आहेत.

 

 

 

 

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ २००४ ते २०१४ या कालावधीत काँग्रेसकडे होता. २००४ मध्ये इथून एकनाथ गायकवाड, तर २००९ मध्ये प्रिया दत्त निवडून आल्या.

 

 

 

पण गेल्या निवडणुकांमध्ये दत्त इथून पराभूत झाल्या. त्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसनं या मतदारसंघातून राज बब्बर यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *