माजी मंत्री अनिस अहमद वंचितमध्ये गेले पण उमेदवारी अर्जच भरू शकले नाही,काय घडले कारण ?

Former Minister Anis Ahmed went to Vanchit but could not fill the nomination form, what happened?

 

 

 

मध्य नागपुरात काँग्रेसने मुस्लिम समाजाला उमेदवारी न दिल्याने पक्षावर संताप व्यक्त करीत वंचित बहुजन आघाडीमध्येमध्ये सोमवारी प्रवेश घेणारे

 

व याच पक्षाकडून मध्य नागपूरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे काँग्रेस नेते व माजी मंत्री अनिस अहमद आज वेळेत अर्ज दाखल करू न शकल्याने विधानसभा निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

 

काँग्रेसतर्फे सलग तीन वेळा आमदार आणि अनेक वर्षे मंत्रीपद भूषवलेले अनीस अहमद अनेक वर्षापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र मागच्या काही वर्षात त्यांची भाजपसोबत सलगी वाढली होती.

 

कधी शैक्षणिक संस्थांच्या कामासाठी तर कधी व्यवसायिक कामांसाठी ते सत्ताधाऱ्यांची मदत घेत होते. लोकसभा निवडणुकीतही ते काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय नव्हते.

 

पण विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर त्यांनी काँग्रेसने मध्य नागपुरातून अल्पसंख्यांकांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती.

 

अल्पसंख्यांकाना उमेदवारी न दिल्यास हा समाज काँग्रेसपासून दूर जाईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती. पण त्यांनी विधानसभेसाठी पक्षाकडे अर्ज केला नव्हता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते.

 

काँग्रेसने मध्य नागपुरातून बंटी शेळके यांची उमेदवारी जाहीर करताच त्यांनी एकदम काँग्रेसवर टीका करणे सुरू केले. काँग्रेस मुस्लिमांवर अन्याय करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले. अपेक्षेप्रमाणे सोमवारी त्यांचा मुंबईत वंचत्मध्ये प्रवेश झाला. ते मध्य नागपूरमधून वंचितचे उमेदवार असतील असे जाहीर करण्यात आले.

 

ते मंगळवारी अर्ज भरणार होते. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यासमवेत जिल्हाधिकारी जाणार होते.

 

अर्ज भरण्याची वेळ संपत आली तरी अनिस अहमत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेच नाही, त्यामुळे सर्वांचे लक्ष ते येणार किंवा नाही याकडे लागले होते. अशात ते आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

 

३ वाजून २ मिनिटानी जिल्हाधीकारी कार्यालयात दाखल झाले आणि अर्ज भरण्याची वेळ ही ३ वाजताच संपलेली होती. त्यांनी आतमध्ये प्रवेश केला मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.

 

त्यांमुळे जागावाजा करीत वंचितमध्ये प्रवेशकर्ते झालेले अनिस अहमद पक्षाची उमेदवारी मिळूनही निवडणूक लढण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

 

याबाबत वंचित आघाडीचे शहर प्रमुख रवी शेंडे यांच्याशी संवाद साधला त्यांनी सांगितले, अनिस अहमद यांनी वंचित बहुजन समाज आघाडीत प्रवेश केल्यामुळे आमची ताकद वाढली होती.

 

मध्य नागपुरात आम्हाला चांगला उंमेदवार त्यांच्या रुपाने मिळाला होता. अर्ज भरण्याच्यावेळी पक्षाचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले होते मात्र अनिस अहमद यांना पोहचण्यास उशिर झाल्यामुळे ते त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.

 

अनिस वंचितमध्ये गेल्यामुळे व ते निवडणूक लढणार असल्यामुळे उमेदवारीमुळे मध्य नागपूरमध्ये मुस्लिम मतांच्या विभाजनाची शक्यता वर्तवली जात होती.

 

त्यामुळे ही भाजपचीच खेळी असल्याची चर्चा होती. मध्य नागपूर हा मुस्लिम व हलबाबहुल मतदारसंघ आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून

 

भाजपने हलबा समाजाचे विकास कुंभारे यांना उमेदवारी दिली. यंदाही ते स्पर्धेत होते. पण, यावेळी भाजपने गैरहलबा प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *