रामदास आठवले राज ठाकरेंवर भडकले म्हणाले….

Ramdas Athawale got angry at Raj Thackeray and said...

 

 

 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदतदेखील संपुष्टात आली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष असला तरी ही निवडणूक महायुतीसाठी अत्यंत सोपी आहे.

 

लोकसभेला महाराष्ट्रात नरेटीवमुळे आमचं मोठं नुकसान झालं, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं. तसेच, विधानसभा निवडणुकीत महायुतीला किती जागांवर विजय मिळणार हेही भाकीत त्यांनी केलंय.

 

मुलाखतीत राज ठाकरेंनी रामदास आठवलेंसारखं मंत्री व्हायचं झाल्यास मी माझा पक्ष बंद करेन असे म्हटले होते. त्यावर, रामदास आठवलेंनीही पलटवार केला आहे, मी आता मंत्री आहे, राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा, असे आठवले यांनी म्हटले

 

 

लोकसभेला आम्हाला झालेलं मतदान हे मोठं आहे. त्यामुळे, महायुतीला विधानसभेला 170 पर्यंत जागा मिळतील, असा अंदाज रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय.

 

RPI ला एकच जागा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमधे नाराजी होती. मात्र, मी ती दूर केली आहे. विधानसभेला जरी आम्हाला एक जागा असेल तरी आम्हाला

 

एक विधानपरिषद आणि सत्ता आल्यावर मंत्रिपद देण्याचं आश्वासन फडणवीस आणि शिंदे यांनी दिल्याचे देखील रामदास आठवले यांनी सांगितले.

 

राज ठाकरे म्हणाले पक्ष बंद करेन, या विधानावरही रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे एका पक्षाचे नेते आहेत मी त्यांच्या विरोधात कधी बोलत नाही.

 

माझ्यासारखा माणूस त्यांच्या पक्षात जाणार नाही. मी पँथर काळापासून संघर्ष केला आहे, त्यामुळं मला मंत्रिपद मिळाल आहे. राज ठाकरे यांना बोलू द्या,

 

असेही आठवले यांनी म्हटले. तसेच, माझा पक्ष गरिबांचा पक्ष आहे, आता मी मंत्री झालोय तर राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष बंद करावा, असा टोलाही रामदास आठवले यांनी लगावला.

 

अरविंद सावंत हे तसे चांगलं कल्चर असलेले खासदार आहेत. शायना एन सी यांना माल म्हणणे ही गंभीर बाब आहे. त्यांचा अपमान म्हणजे सगळ्या महिलांचा अपमान आहे,

 

अशा शब्दात रामदास आठवले यांनी शिवसेना युबीटी नेते अरविंद सावंत यांच्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच, उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करावी, सोबतच महिला आयोगाने देखील याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केलीय.

 

दरम्यान उमेदवारांच्या व नेत्यांच्या वाढलेल्या संपत्तीबाबत देखील आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली. संपत्ती ही लिमिटेड असावी, ती फार वाढावी या मताचा मी नाही. पण जर ते लोक एखाद्या व्यवसायात उतरले तर त्यांची संपत्ती वाढते, असे त्यांनी म्हटले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *