narayan rane;राणेंनी केली उद्धव ठाकरे,राज ठाकरेंवर टीका,संजय राऊत म्हणाले; वय झालं, टोपाचे केसही पिकलेत, त्याचं भान ठेवा

Rane criticized Uddhav Thackeray, Raj Thackeray, Sanjay Raut said; He has grown old, even the hair on his head has grown, be aware of that

 

 

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काहीच ताकद नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तरी काही फरक पडणार नाही.

 

भाजप नावाचा महापूर आला आहे. त्यात सर्व वाहून जातील, अशा शब्दात भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज-उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली होती.

 

नारायण राणे यांच्या या विधानाचा मनसे नेते अविनाश जाधव यांनी खरपूस समाचार घेतला आहे. थोडे फार मैत्रीला जागा. राज ठाकरे होते म्हणून तुमचं तिकीट वाचलं, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी राणेंना सुनावलं आहे. तसेच जाधव यांनीही राणेंची खिल्ली उडवली आहे.

हे सुद्धा वाचा ;….Agriculture breaking News;शेतकऱ्यांना सरकारने केले महत्वाचे आवाहन ,हि चूक करू नका !

मनसे नेते अविनाश जाधव मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिलं. आमची ताकद नाही तर मग नारायण राणे तुम्ही कशाला आमची दखल घेता? नारायण राणे साहेबांना सांगू इच्छितो की, मैत्रीला थोडंफार जागा.

 

हेच राज साहेब ठाकरे तुमचे तिकीट वाचवण्यासाठी होते. तुमच्यासाठी कोकणामध्ये सभा घेतली. सभा घेण्यासाठी तुम्ही राज साहेबांना किती फोन केले मला माहीत आहे, असं म्हणत अविनाश जाधव यांनी राणेंची खिल्ली उडवली.

 

तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी ही सभा आवश्यक होती. याचा अर्थात आमची महाराष्ट्रामध्ये ताकद काय हे कोणी सांगायची गरज नाही, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी राणेंची खिल्ली उडवली.

हे सुद्धा वाचा ;….Bollywood News; Shahrukh Khan;ऑर्थर रोड जेलमध्ये असतांना शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान काय खात असे ?

दोन्ही ठाकरे बंधू ताकदवान आहेत. दोन्ही भावांची युती व्हावी ही महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील व्यक्तींची इच्छा आहे. ज्या दिवशी हे होईल तेव्हा आगीत तुम्ही तेल का टाकलं? असा सवाल भाजपवाले नारायण राणेंना नक्कीच विचारतील, असा चिमटाही त्यांनी काढला.

 

गेल्या 2-3 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं, भरलं. या मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार यांनी सरकारला लक्ष्य केलं, त्यानंतर आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरूच झाला आहे.

 

आदित्या ठाकरेंच्या टीकेला काल आधी नारायण राणे मग नितेश राणेंनीही चोख प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका केली. नारायण राणेंनी तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही सोडलं नाही.

हे सुद्धा वाचा ;….maharashtra;corona breaking कोरोनाची पुन्हा लाट ;आता मास्क सक्ती होणार ?

संजय राऊतांच्या नादाला लागू नका,ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले होते असे म्हणत त्यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं. मात्र त्यांच्या या विधानानंतर संजय राऊत चांगलेच बडकले असून त्यांनीही नारायण राणेंवर थेट निशाणासाला. राणेंनी आपल्या वयाचं भान ठेवावं. आपलं वय झालं. आपल्या टोपाचे केसही पिकलेत. याचं त्यांनी भान ठेवावं, असं म्हणत राऊतांनी राणेंवर सडकून टीका केली.

 

आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी नारायण राणेंवर तर टीका केलीच पण पंतप्रधान मोदीही त्यांच्या निशाण्यावर होते. संजय राऊतांच्या नादाला लागू नका, ते काय महात्मा आहेत का? असं काल राणे म्हणाले होते. त्यावर राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

हे सुद्धा वाचा ;….Agriculture News :”या” शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार घेऊ शकते ताब्यात ,जाणून घ्या

‘ पाकिस्तानात कुणाला पाठवायचं हे भविष्यात ठरवू. मोदींनी पाकिस्तानविरोधात मोदींनी दंड भरले होते ते पिचके आहेत का ?. प्रेसिडंट ट्रम्पने दम भरताच पाकिस्तानात जाणाऱ्या सैन्याला माघारी का बोलावलं हे राणेंनी स्पष्ट करावं, असं आव्हान राऊतांनी दिलं. ऑपरेशन सिंदूर चालवलं.

 

पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेणार अशी गर्जना मोदी आणि भाजपने केली त्याचं काय झालं ? याचं उत्तर राणेंनी द्यावं. पाकिस्तानात तुम्हाला पाठवायचं की मोदींना ?. आम्ही नाही गेलो पाकिस्तानात, पण मोदीच नवाज शरीफचा केक कापायला पाकिस्तानात गेले होते. हे बहुतेक राणे विसरलेले दिसत आहेत असा टोला त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा ;….Maharashtra Breaking News;आचारसंहिता लागू, पाच 5 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुका जाहीर

नवाज शरीफचा केक कापायला कोण गेलं तर मोदी गेले मिस्टर राणे. आम्ही नाही गेलो. राणेंनी आपल्या वयाचं भान ठेवावं. आपलं वय झालं. आपल्या टोपाचे केसही पिकलेत. याचं त्यांनी भान ठेवावं. आणि प्रगल्भ वक्तव्य करावं’ अशा शब्दांत त्यांनी राणेंना खोचक टोला हाणला.

 

राणे हे भारतीय जनता पक्षाचे आश्रित असल्याची टीकाही राऊतांनी केली. ” तुम्ही कोण आहात? तुम्ही तर भाजपचे आश्रित आहात. तुम्ही स्वत:चा पक्ष काढून दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतं. राज ठाकरे यांचा स्वत:चा पक्ष आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्याकडे चोरलेला पक्ष आहे, पण तुम्ही भाजपचे आश्रित आहात. उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वत:चे 20 आमदार आणि 9 खासदार आहेत. भाजपचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा, असं राऊतांनी राणेंना सुनावलं. ‘फक्त स्वत:च्या पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका,

हे सुद्धा वाचा ;….कुर्बानीसाठी अतिशय स्वस्त दरात शेतकऱ्याकडून बकरे विक्रीला

हे सुद्धा आकडे मोजा. आणि जी लढाई निवडणुकीत झाली नाही त्यातला हा विजय आहे. पाकिस्तानमध्ये घुसलेल्या सैन्याचे ज्यांनी पाय खेचले. त्यांच्या शौर्याचे पोवाडे राणेंनी गाऊ नये ‘ असा चिमटाही राऊतांनी काढला.

 

पहिल्याच पावसात रेल्वेची दाणादाण उडाली. त्यावरही अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन दिवसापूर्वी माझ्या फेसबुकवर एका महिलेने कमेंट केली होती. प्रचंड पाऊस आहे.

 

फ्लॅट क्रमांक पाचवर जेव्हा आम्ही ट्रेन पकडतो तेव्हा त्या ठिकाणी वर शेड नाही. त्यामुळे महिलांना भिजतच ट्रेन पकडावी लागते.छत्री उघडू शकत नाही कारण की मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

हे सुद्धा वाचा ;….सुप्रिया सुळेंची राजकीय चाल बदलली ,मोदी सरकारला पाठिंबा तर इंडिया आघाडीला सुनावले

यासाठी हा पाहणी दौरा केला. पावसाळा सुरू झालेलं आहे. ठाणे स्टेशन हे महत्त्वाचं स्टेशन आहे. पण या स्थानकात 300 ते 400 मीटरपर्यंत छतच लावलें नाही. स्टेशनची दुरावस्था झाली असून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरीत लक्ष दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.

 

एवढ्या गजबलेल्या स्टेशन परिसरात फ्लाटवरचे पत्रे तुटले आहेत. शौचालयही बंद आहे. एका ठिकाणी तर दोन पत्रे तारेने बांधलेले आहेत. पावसाळ्यात मोठं वादळ आलं तर स्टेशनवर मोठी दुर्घटना होऊ शकते. या सर्व गोष्टी आम्ही निदर्शनास आणून दिल्या आहेत.

 

चार दिवसात यात बदल झाला नाही तर मनसे मोठं आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. आमचं ठाणे स्टेशन हे देशातील पहिलं स्टेशन आहे. भारतीय इतिहासात ते शेवटचंही ठरू शकतं, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा ;…. हवमान विभागाने सांगितले ,जूनमध्ये किती पाऊस पडणार

प्रशासन निगरगठ्ठ आहे. खासदार आणि मंत्र्यांनी सांगूनही काम करायचं नसेल तर अशा अधिकाऱ्यांना चोप दिला पाहिजे. या ठाणे स्टेशनला हेरिटेजच्या दर्जा दिला पाहिजे.

 

जगभरातील लोकांनी हे स्टेशन पाहायला आलं पाहिजे असं स्टेशन तुम्ही बनवलं पाहिजे. आम्ही ठाणेकर सांगून सांगून थकलो आहे. स्टेशवर यायलाही भीती वाटते, असंही ते म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *