सुप्रिया सुळेंची राजकीय चाल बदलली ,मोदी सरकारला पाठिंबा तर इंडिया आघाडीला सुनावले
Supriya Sule's political move changed, she supported the Modi government and supported the India Aghadi.

सध्याची वेळ ही दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याची आहे, राजकीय टीकाटिप्पणीचे नंतर पहाता येईल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत बोलताना मांडली.
दहशतवाद आणि त्याच्या समर्थकांशी लढण्याच्या भारताच्या संकल्पाची माहिती आपण जागतिक नेत्यांना देऊ असेही सुळे यांनी सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुद्द्यावर पाकिस्तानचा कावा जगासमोर सांगण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध देशांत पाठविण्यात येणाऱ्यापैकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व सुळे करत आहेत.
हे सुद्धा वाचा ;…. Political news;महायुतीत तणाव ;मला भाजपने पाडले आता तडजोड नाही,दादांच्या राष्ट्रवादीचा नेता भाजपविरोधात मैदानात
या संपूर्ण लष्करी मोहीमेच्या विषयावर राजकारणाला जागा नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगून इंडिया आघाडीतील कॉंग्रेसलाही घरचा आहेर दिला.
भारत दहशतवाद आणि त्याच्या प्रायोजकांविरुद्ध एकजूट आहे हे जगाला सांगण्याची ही वेळ आहे असेही सुळे म्हणाल्या.
हे सुद्धा वाचा ;…. लग्नात भेटीच्या फॉर्च्युनर कारची चाबी अजित पवारांच्या हस्ते दिली ?,आता दादा म्हणतात ‘माझा काय संबंध?
विदेशांत जाणाऱ्या शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्या सुळे यांच्या शिष्टमंडळात भाजपचे राजीव प्रताप रुडी, अनुराग ठाकूर आणि व्ही मुरलीधरन, काँग्रेसचे मनीष तिवारी आणि आनंद शर्मा,
तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) नेते एल श्रीकृष्ण देवरायलू, आपचे विक्रमजीतसिंग साहनी आणि माजी राजनयिक सय्यद अकबरुद्दीन यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्तला भेट देणार आहे.
हे सुद्धा वाचा ;…. चक्क, छगन भुजबळांनाच थेट मागितली 1 कोटींची खंडणी
सुळे यांनी पत्रकारांना सांगितले की, सध्या राजकारणाची नाही तर भारताबद्दल जागतिक पातळीवर बोलण्याची वेळ आहे. पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेला हल्ला हा भारताच्या आत्म्यावर हल्ला होता.
दहशतवादाचे प्रायोजकत्व करणाऱ्यांबाबत कोणतीही उदारता दाखवू नये असा स्पष्ट संदेश देण्यासाठी आमचा प्रतिसाद संतुलित होता.
काँग्रेसकडून या मुद्द्याचे राजकारण सुरू असल्याच्या प्रयत्नांवर सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या वतीने स्पष्ट केले आहे की ही राजकारण किंवा टीका करण्याची वेळ नाही.
हे सुद्धा वाचा ;…. Babajani Durrani ;बाबाजानी दुर्रानीना सत्तेशिवाय करमेना
आपल्या सर्वांकडे केंद्र सरकारला विचारण्यासाठी काही कठीण प्रश्न आहेत. परंतु सरकारसोबत एकजूट राहण्याची सध्याची वेळ आहे.
भारत एकजूट आहे आणि दहशतवादाबद्दल कोणतीही उदारता दाखवली जाणार नाही हे दाखवण्याची ही वेळ आहे. राजकीय वक्तृत्वात रमण्याची ही वेळ नाही.
सत्तेत कोणीही असो, ‘प्रथम राष्ट्र, नंतर राज्य, नंतर पक्ष आणि नंतर कुटुंब,” असेच आमच्या पक्षाचे धोरण होते, आहे व असेल असेही सुळे म्हणाल्या.
परदेशात पाठवल्या जाणाऱ्या या नेत्यांमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणदेखील होते.
मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, युसूफ पठाण इतर खासदारांसोबत जाणार नसल्याची माहिती ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने रविवारी दिली.
हे सुद्धा वाचा ;…. Dharashiva News;अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या गाडीला अपघात
युसूफ पठाण किंवा तृणमूल पक्षातील इतर कोणताही खासदार या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग असणार नाही. मागे कोणतंही अधिकृत कारण टीएमसीने दिलेलं नाही. पक्षाकडून याबाबत केंद्र सरकारला माहिती देण्यात आली आहे.
ममता बॅनर्जींच्या टीएमसी पक्षाने सांगितलं, की ‘सर्वात आधी राष्ट्र येते आणि राष्ट्र संरक्षणासाठी आवश्यक असलेली कोणतीही कारवाई करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
आपल्या सशस्त्र दलांनी देशात अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे, यासाठी आपण सर्वच नेहमीच त्यांचे ऋणी राहू. परराष्ट्र धोरण पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे.
म्हणूनच, आपलं परराष्ट्र धोरण ठरवण्याची आणि त्याची संपूर्ण जबाबदारी घेण्याची परवानगी केवळ केंद्र सरकारलाच द्यायला हवी’, असं TMC ने सांगितलं आहे.
केंद्र सरकारने ७ सर्वपक्षीय टीम वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर पाठवण्याची घोषणा केली. ही टीम ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती सर्व देशांत देईल, त्याचं सत्य सांगेल. त्याशिवाय पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचाही पर्दाफाश केला जाईल.
हे सुद्धा वाचा ;…. राज्याला रेड अलर्ट; अवकाळीचा कहर; ‘मान्सून’ कधी ?
सरकारच्या परदेशात जाणाऱ्या सर्वपक्षीय टीममध्ये भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, जेडीयूचे संजय कुमार, द्रमुकच्या कनिमोझी, राष्ट्रवादी (शरद पवार) सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे.
हे सर्व वेगवेगळ्या शिष्टमंडळांचे नेतृत्व करतील. एकूण ५१ नेत्यांना परदेशात पाठवलं जात आहे. हे शिष्टमंडळ ३२ देशांसह ब्रुसेल्समधील युरोपियन युनियन मुख्यालयाला देखील भेट देतील.