WEATHER ALERT;हवामान विभागाने सांगितले ,जूनमध्ये किती पाऊस पडणार

The weather department said, how much rain will fall in June

 

हे सुद्धा वाचा;… कुर्बानीसाठी अतिशय स्वस्त दरात शेतकऱ्याकडून बकरे विक्रीला

 

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, यंदा तब्बल बारा दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, दरम्यान जून महिन्यात देशभरात मान्सूनच्या पावसाचं प्रमाण कसं असेल याबाबतचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज समोर आला आहे.

 

यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा जून महिन्यात पावसाचं प्रमाण दीर्घकाली सरासरीच्या तुलनेत 108 टक्के इतकं असणार आहे.

 

यंदा जूनमध्ये पडणारा पासून मागच्या 16 वर्षांचं रेकॉर्ड मोडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जून महिन्यात उत्तर-पश्चिम भारतामध्ये पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता आहे. तर पूर्वोत्तर भारतात मात्र कमी पाऊस पडू शकतो.

हे सुद्धा वाचा;…मुलाला कपडे घेऊन देते म्हणून नागपूरची महिला पोहोचली थेट पाकिस्तानात

भारतीय हवामान विभाग आयएमडीचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा मध्य आणि दक्षिण भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

 

आयएमडीने सोमवारी म्हटलं आहे की, यंदा मान्सून आपल्या सामान्य वेळेपेक्षा 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे.1950 नंतर असं पहिल्यांदाच घडलं आहे.

 

तर दुसरीकडे यंदा भारताच्या मुख्य भूमीवर देखील मान्सूनचं आगमन हे वेळेआधीच झालं आहे. 2009 नंतर म्हणजे तब्बल 16 वर्षांनंतर भारतात मान्सून वेळेआधी दाखल झाला आहे.

हे सुद्धा वाचा;…Jarange Patil attack on Bhujbal ;भुजबळांनी मंत्रि‍पदाची शपथ घेताच जरांगे पाटील संतापले ,केला थेट हल्लाबोल

सामान्यपणे मान्सून एक जूनला केरळमध्ये प्रवेश करतो, तर 11 जूनला मुंबईमध्ये दाखल होतो.आठ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देशाला व्यापतो. तर 17 सप्टेंबरापासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो.

 

15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून देशातून माघारी जातो. मात्र यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला असून, सरसारीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

 

दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्राला पावसानं प्रचंड झोडपलं आहे, गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे. कोकणासह विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाड्यातही जोरदार पाऊस झाला आहे.

हे सुद्धा वाचा;…Monsoon Marathwada;पावसाळ्यात देशभरात भरपूर पाऊस पडणार, मात्र मराठवाड्यासाठी हवामान विभागाची चिंताजनक बातमी

पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. यंदा मे महिन्यातच नद्यांना पूर आल्याचं चित्र आहे. मुंबईत देखील गेले दोन दिवस जोरदार पाऊस झाला आहे.

 

दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 27 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 28 मे रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे.

 

दिनांक 27 मे रोजी लातूर, धाराशिव जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 28 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, लातूर जिल्हयात तर दिनांक 29 मे रोजी हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, जालना व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना,

हे सुद्धा वाचा;…Supreme Court;प्रसिद्धीसाठी जनहित याचिका दाखल करणे अंगलट ,भरावा लागला 7000 रुपयांचा दंड

वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 29 ते 31 मे दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 30 मे ते 05 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

 

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.

हे सुद्धा वाचा;…maharashtra;corona breaking कोरोनाची पुन्हा लाट ;आता मास्क सक्ती होणार ?

संदेश : सध्याचा पाऊस हा पूर्वमोसमी असल्याने शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने पीक कापणी पुढे ढकलावी आणि कापलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे.

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

 

पीक व्‍यवस्‍थापन

नांगरणी नंतर मोगडणी करावी. मोगडणीनंतर दोन-तिन वखराच्या पाळया द्याव्यात. शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी 5 टन व बागायती लागवडीसाठी 10 टन चांगले कुजलेले शेणखत शेतात समप्रमाणात पसरावे. कापूस पिकाच्या लागवडीसाठी वाण निवडताना जमिन व हवामान, कोरडवाहू किंवा बागायती, लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा विचार करून वाणांची निवड करावी.

हे सुद्धा वाचा;…अमित शहांकडे भाजप आमदारांनी केली अजित पवारांची तक्रार

तुर पिकाच्या पूर्व मशागतीसाठी वखराच्या 2 ते 3 पाळया द्याव्यात. शेवटच्या पाळी अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. तुर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-2013-41(गोदावरी), बीडीएन-711, बीएसएमआर-736, बीएसएमआर-853 (वैशाली), बीडीएन-716, बीडीएन-2, बीडीएन-708 (अमोल), एकेटी 8811, पीकेव्ही तारा किंवा आयसीपीएल 87119 इत्यादी वाणांचा वापर करावा.

 

पावसाळ्यात तूर पिकावरील फायटोप्थोरा करपा टाळण्यासाठी, शेताच्या चारी बाजूस तीन फूट खोल आणि दोन फूट रुंद चर काढावी जेणे करून अतिवृष्टी मध्ये शेतातील मातीची धूप होणार नाही व पिकाचे मुळे सडणार नाहीत. तसेच पुढे चरातील पाणी पाऊस ओसरल्यावर शेतातील पिकास परत कामी येईल.

 

मुग/उडीद लागवडीसाठी कुळवाच्या 2 पाळया द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. मुग पेरणीसाठी कोपरगाव, बीएम-4, बीपीएमआर-145, बीएम-2002-1, बीएम-2003-2, फुले मुग 2, पी.के.व्ही.ए.के.एम 4 इत्यादी वाणांचा वापर करावा तर उडीद लागवडीसाठी बीडीयु-1, टीएयू-1, टीपीयू-4 इत्यादी वाणांचा वापर करावा. भुईमूगाच्या पेरणीसाठी वखराच्या दोन ते तिन पाळया द्याव्यात.

हे सुद्धा वाचा;…लग्नात भेटीच्या फॉर्च्युनर कारची चाबी अजित पवारांच्या हस्ते दिली ?,आता दादा म्हणतात ‘माझा काय संबंध?

शेवटच्या वखरपाळी पूर्वी प्रति हेक्टरी 10 गाडया शेणखत/कंपोस्ट खत पसरून जमिन भुसभूशीत करावी. भुईमूग पिकाच्या लागवडीसाठी एसबी-11, जेएल-24, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24, टीजी-26, टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-123 इत्यादी वाणांचा वापर करावा. वखराच्या एक ते दोन पाळया देऊन जमिन तयार करावी. मका पिकाच्या पेरणीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर, जेके-2492, महाराजा, यूवराज इत्यादी वाणांचा वापर करावा.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळीच्या नवीन लागवडीसाठी लागवड करण्या अगोदर हेक्टरी 90 ते 100 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे. नविन केळी बाग लागवडीसाठी ग्रँड नाईन, अर्धापूरी, बसराई (देशावर), श्रीमंती, फुले प्राईड इत्यादी जातींचा वापर करावा.पूर्वी लागवड केलेल्या बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा.

हे सुद्धा वाचा;…Bollywood News; Shahrukh Khan;ऑर्थर रोड जेलमध्ये असतांना शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान काय खात असे ?

आंब्याच्या नवीन लागवडीसाठी 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सूपर फॉस्फेट व 50 किलो शेणखत ‍किंवा कंपोस्ट खत टाकावे व पोयटा मातीने सर्व मिश्रणासहीत खड्डा भरून घ्यावा. नविन आंबा बाग लागवडीसाठी केसर, पायरी, तोतापूरी, निलम, सिंधू, साईसुगंध, वनराज, लंगडा, रत्ना, परभणी भूषण, निरंजन मल्लीका, दशेहरी इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

 

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी. सिताफळाच्या नवीन लागवडीसाठी 45X45X45 सें.मी. या आकाराचे खड्डे घेऊन त्यात एक ते दिड घमेले चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत, अर्धा किलो सुपर फॉस्फेट, फॉलीडॉल पावडर घालून व चांगल्या मातीच्या मिश्रणाने ते भरावे.

हे सुद्धा वाचा;…Agriculture News :”या” शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार घेऊ शकते ताब्यात ,जाणून घ्या

नविन सिताफळ बाग लागवडीसाठी बालानगर, टिपी-7, धारुर-6, अर्कासहान इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान सिताफळ झाडांना काठीने आधार द्यावा.

हे सुद्धा वाचा;…pune Crime News;वैष्णवी हगवणे प्रकरणात काही बडे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

भाजीपाला

खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी.

 

फुलशेती

खरीप हंगामात फुलपिकाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

हे सुद्धा वाचा;…Weather alert ;सावधान;मंगळवारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार व हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *