हवामान विभागाकडून उष्णतेचा ‘रेड अलर्ट’

'Red Alert' for heat from Meteorological Department

 

 

 

 

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा दाह अधिक वाढत असतानाच काही भागांना मात्र अवकाळी पावसाचा मारा सोसावा लागत आहे.

 

 

 

इथं मान्सूनची प्रतीक्षाही शिगेला पोहोचली आहे. एकंदर राज्यातील हवामानाची स्थिती सातत्यानं बदलत असून, येणारा काळ उष्मा वाढवणारा असेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

 

 

 

पुढील 24 तासांसाठी राज्याच्या उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र भागामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा असून, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ

 

 

 

आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील तुरळक क्षेत्रात

 

 

 

उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मुंबईच्या हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात काही ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

सध्याच्या घडीला राज्यात सूर्य आग ओकत असून, महाराष्ट्रातले बहुतांश जिल्हे 40°c च्या पलिकडे पोहोचले आहेत. सोलापूरात तापमान 44°c वर गेलं असून,

 

 

 

ठाणे जिल्ह्यात तापमान 42 अंश सेल्सिअस वर गेलं आहे. पुण्यात तापमानाचा आकडा 41.7 अंश सेल्सिअस, मालेगावात 43 अंश तर, संभाजीनगरचा पारा चाळीस अंशाच्याही पलिकडे पोहोचला आहे.

 

 

 

आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहारमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

 

ही स्थिती पाहता देशाच्या काही राज्यांमध्ये स्थानिक शासनाच्या वतीनं आरोग्यविषयक सूचना जारी करण्यात आल्या असून, काही राज्यांनी शाळांनाही सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

 

 

 

दरम्यान, देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीरच्या रामबन आणि बनिहाल भागांमध्ये पाऊस, भूस्खलनामुळं विविध ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत.

 

 

 

01 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व नांदेड जिल्हयात तापमानात वाढ होऊन तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

सामान्य सल्ला:

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 03 ते 09 मे दरम्यान पाऊस नाही, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त आणि किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 ते 11 मे 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

संदेश :

नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

 

 

 

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

 

 

 

पीक व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे.

 

 

 

 

पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करावा. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करावीत.

 

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी व आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

 

 

 

 

बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल.

 

 

 

काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची व आंबा फळांची काढणी शक्यतो सकाळी लवकर करून घ्यावी. द्राक्ष बागेमध्‍ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 मे पर्यंत करता येते.

 

 

 

 

भाजीपाला

काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची, कांदा, टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी शक्यतो सकाळी लवकर करावी. तूरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.

 

 

 

 

पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा. नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.

 

 

 

 

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी शक्यतो सकाळी करून बाजार पेठेत पाठवावी. तूरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, फुल पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.

 

 

 

 

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, उन्हाळयात होणाऱ्या उष्माघाताचा ताण टाळण्यासाठी जनावरांच्या शरीरावर दर अर्ध्या तासाने पाच मिनिटाकरीता पाणी फवारण्यात यावे.

 

 

 

 

कमाल तापमानात झालेली वाढ व पुढील चार दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दुपारी 4 या दरम्यान काम करून घेऊ नये.

 

 

 

 

उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठयाच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मुबलक प्रमाणा हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे.

 

 

 

तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणवठयावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चरावयास सोडावे.

 

 

 

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

 

 

 

 

 

कृषि अभियांत्रिकी

रब्बी पिकांच कापणी झाल्यानंतर शेतात नांगरणी करून घ्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून घ्यावे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *