‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

Heavy rain in 'Ya' districts, orange alert from meteorological department

 

 

 

 

वरुणराजा पुन्हा एका सक्रीय झाला आहे. मान्सूने राज्यासह देशात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने

 

 

 

अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पावसाचा काय अंदाज हवामान विभागाने सांगितलाय जाणून घ्या.

 

 

 

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मुंबई शहर  आणि उपनगरात मधूनमधून

 

 

 

 

मध्यम ते जोरदार पाऊस मेघगर्जनेसह बरसण्याचा अंदाज आहे. इथे आज सामान्यतः ढगाळ आकाश राहील. तर, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 26°C च्या आसपास असेल.

 

 

 

 

तर उत्तर कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

त्यासोबतच दक्षिण कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

 

 

पुढील 5 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

 

 

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

दिनांक 21 जून रोजी नांदेड, हिंगोली, जालना, परभणी जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 22 जून रोजी बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 23 जून रोजी बीड, धाराशिव व लातुर जिल्हयात

 

 

 

बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 24 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

दिनांक 21 जून रोजी नांदेड, हिंगोली, जालना, परभणी जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 22 जून रोजी बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 23 जून रोजी बीड, धाराशिव व लातुर जिल्हयात बऱ्याच ठिकाणी

 

 

 

तर दिनांक 24 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व किमान तापमानात पुढील दोन दिवसात 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

 

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 21 ते 27 जून दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची व 28 जून 04 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे.

 

 

 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 जून ते 02 जूलै 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : पूर्णा, पालम ; हिंगोली जिल्हा : वसमत, सेनगाव ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हतगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

 

 

संदेश :

मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते.

 

 

 

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

 

 

 

 

पीक व्‍यवस्‍थापन

कोरडवाहू बिटी कापूस पिकास 120:60:60 किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी 48 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 60 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. बागायती बिटी कापूस पिकास 150:75:75 किलो ग्रॅम नत्र,

 

 

 

स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी 30 किलो नत्र, 75 किलो स्फुरद व 75 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. तूर पिकास 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी खतमात्रा पेरणीच्यावेळी जमिनीत पेरून द्यावी.

 

 

 

तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. मूग/उडीद पिकास पेरणीच्यावेळी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद हेक्टरी मात्राद्यावी. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. भुईमूग पिकास 20 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी खतमात्रा पेरणीच्यावेळी जमिनीत पेरून द्यावी.

 

 

 

 

भुईमूग पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते. मका पिकास 150:75:75 किलो नत्र, स्फुरद व पालाश रासायनिक खतमात्रापैकी अर्धे नत्र संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व 75 किलो नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते.

 

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन केळी, आंबा व सिताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. बागेत पानांची विरळणी करावी. बागेत आर्द्रता वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

 

 

भाजीपाला

भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

 

 

 

फुलशेती

फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

 

 

 

 

पशुधन व्यवस्थापन

पीपीआर या विषाणूजण्य रोगाचा प्रादूर्भाव पावसाळयाच्या सुरुवातीस वाढत जातो. म्हणून या रोगावर उपलब्ध असलेल्या लसीचे तिन महिने व त्यावरील वयोगटातील शेळी-मेंढीच्या पिल्लांमध्ये लसीकरण करून घ्यावे. ही लस गर्भ धारण शेळी-मेंढी मध्ये करू नये.

 

 

 

 

तुती रेशीम उद्योग

प. बंगाल राज्यातून स्‍थलांतरीत झालेली व कर्नाटक, आंध्र प्रदेशात हाहाकार माजवत असलेली व रेशीम कीटकावर प्रादूर्भाव करणार किड उझी माशी सन 2018 पासून महाराष्ट्रातील जालना, बीड, लातूर व परभणी जिल्हयात रेशीम कोष पिकाचे 20 ते 30 टक्के नुकसान करत असल्याचे अढळून आले आहे.

 

 

 

भारतात 80 टक्के कच्चे रेशीम कीटक संगोपनगृह असून महाराष्ट्र राज्यात 98 टक्के कच्चे शेडनेट गृहच रेशीम कीटक संगोपनासाठी शिफारस करण्यात आले आहेत.

 

 

 

शेतकऱ्यांनी हळूहळू 1 ते 1.5 एकर तुती बागेसाठी पक्के संगोपनगृह बांधुन घ्यावीत म्हणजे रेशीम कोष उत्पादनात सातत्य आणि शाश्वतता टिकून राहील.

 

 

 

 

उझी माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाने साठवण गृह (अंधार खोली) ॲन्ट रूम असावी. सरळ तुती फांद्या संगोपनगृहात नेवून खाद्य न देता अंधार खोलीत 2 तास ठेवून नंतर खाद्य द्यावे.

 

 

 

सामुदायिक विज्ञान

पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.

 

 

 

कृषि अभियांत्रिकी

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *