हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा
Heat wave warning from the Meteorological Department

आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने या मुसळधार पावसाबाबत सावध राहण्यास सांगितले आहे.
याशिवाय आज पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि पूर्व राजस्थानमध्ये जोरदार वाऱ्यांबाबत पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मार्च ते मे 2025 या कालावधीत, ईशान्य भारत, उत्तर भारत आणि द्वीपकल्पीय भारतातील दक्षिण-पश्चिम आणि दक्षिणी भाग वगळता देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्य दिवसांपेक्षा जास्त उष्णतेची शक्यता आहे.
उष्णतेच्या लाटा वृद्ध, मुले आणि असुरक्षित लोकसंख्येसाठी महत्त्वपूर्ण धोका निर्माण करतात. लोकांच्या सोयीसाठी, IMD आगाऊ उष्णतेच्या लाटेचा इशारा देते, जेणेकरून लोकांना नंतर कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये.
या महिन्यात म्हणजेच मार्च 2025 दरम्यान, देशभरातील सरासरी पाऊस (एलपीएच्या 83 ते 117 टक्के) सामान्य राहण्याची शक्यता आहे.
आम्ही तुम्हाला सांगूया की 1971 ते 2020 पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित, मार्चमध्ये देशभरातील पावसाचा LPA सुमारे 29.9 मिमी आहे. हवामान खात्यानेही तापमानाबाबत अलर्ट जारी केला आहे.
IMD ने म्हटले आहे की मार्च 2025 मध्ये द्वीपकल्पीय भारतातील काही दक्षिणेकडील भाग वगळता कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
IMD ने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील उष्णतेच्या लाटेबद्दल माहिती दिली आहे आणि मुसळधार पावसाबद्दलही इशारा दिला आहे.
नुकताच संपलेला फेब्रुवारीचा पूर्ण महिना सरासरी पेक्षा खूप उष्ण ठरला. देशात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान 27.58 अंश सेल्सिअस असते, मात्र यंदा ते 29.7 अंश सेल्सिअस राहिले आहे.
किमान तापमान 13.82 अंश सेल्सिअस असते ते 15.2 अंश सेल्सिअस होते. सरासरीपेक्षा कमाल तापमान 1.49 तर कीमान तापमान 1.20 असं सेल्सिअस ने जास्त होते.
1901 पासूनच्या नोंदीनुसार यंदा फेब्रुवारी दुसर्या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला आहे. 2023 च्या फेब्रुवारीत 29.44°c नोंद झाली होती. त्यामुळे येत्या दोन महिन्यात उष्णतेच्या झळांनी मुंबईकरांना घामाच्या धारा लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पुण्यात तापमानाचा पारा हा दहा वीस नव्हे तर तब्बल सव्वाशे वर्षातील उच्चांक असलेला उन्हाळा ठरलाय.त्यामुळे वाढत असलेला उन्हाळा ही आता चिंतेची बाब बनलीय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
राज्यासह देशभरातील उष्णतेचा पारा हा दिवसात दिवस वाढत असल्याचे पाहायला मिळते. उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाल्याने वातावरणात प्रतीचक्रवात स्थिती निर्माण झाल्याने यंदा राज्यात उन्हाळा जास्त जाणवतो.
पुण्यात तर फेब्रुवारीमध्ये सरासरी तापमानाचा उच्चांकत सव्वाशे वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक 39 कमाल तापमानवाढीचा चटका जाणवलं होता तर सोलापूर,रत्नागिरी मध्ये 38 कमान तापमानाचा उच्चांक नोंदविण्यात आलाय तर सांगली.. सातारा. उस्मानाबाद आणि अकोला मध्ये 37 कमाल तापमानाची नोंद झालीय.
कोणत्या शहराचे किती तापमान?
मुंबई कमाल तापमान 35.3 आणि किमान 21.5
नागपूर कमाल तापमान 34.2 आणि किमान 13.9
नाशिक कमाल तापमान 36.6 आणि किमान 12.4
कोल्हापूर कमाल तापमान 36.0 आणि किमान 19.7
सोलापूर कमाल तापमान 38.0 आणि किमान 19.8
रत्नागिरी कमाल तापमान 38.1 आणि किमान 16.2
सातारा कमाल तापमान 37.0 आणि किमान 15.0
सांगली कमाल तापमान 37.4 आणि किमान 17.4
मालेगाव कमाल तापमान 34.0 आणि किमान 14.0
जळगाव कमाल तापमान 34.3 आणि किमान 9.8
परभणी कमाल तापमान 35.4 आणि किमान 14.1
अकोला कमाल तापमान 36.5 आणि किमान 14.6
याचाच अर्थ पुण्यासह इतरही जिल्ह्यांमध्ये सरासरी कमाल तापमानात 2.6 अंश सेल्सिअसची वाढ झाली. हवामानातील प्रतिचक्रवातामुळे उत्तरेकडून येणारे थंड हवेचे वारे रोखले गेले. त्याचा हा परिणाम आहे. अशीच परिस्थिती राहिली तर ही चिंतेची बाब असल्याचं हवामान तज्ञांचं मत आहे.
फेब्रुवारी प्रमाणेच मार्च आणि मे महिना देखील उष्णतेचा असणार आहे. त्यामुळे उन्हाची बाधा होऊ नये याची काळजी नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. नाहीतर डी हायड्रेशन किंवा उलट्या जुलाब होऊन मोठ्या प्रमाणात अशक्तपणा येऊ शकतो, असे डॉक्टरांनी म्हटलंय.
सध्या जगभरातील तापमानात वाढ होत आहे. पर्यावरणीय बदलांचा हा परिणाम आहे. उत्तर माहिती असूनही त्याला रोखायचं कसं असा प्रश्न जगाला पडलाय.