political news;महायुतीत तणाव;अजितदादांच्या माजी मंत्र्याला बावनकुळेंनी सुनावले

Tension in the Mahayuti; Ajitdada's leader was reprimanded by Bawankule

 

 

 

‘यांनी काम केले नाही, त्यांनी केले नाही, असे बोलण्याचे दिवस आता संपले. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ही वेळ आहे, टीका टीप्पणीची नाही’,

 

असे खडेबोल महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सुनावले.

हे सुद्धा वाचा ;….पोलीस उपनिरीक्षकाला न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा ;पाहा काय आहे प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात बोलताना धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपने विरोधात काम केल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीच्या एका गटानेही मदत केली. त्यामुळे जिल्हा परिषद स्वबळावर लढण्याचे संकेत त्यांनी दिले.

 

“महायुतीत सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले. २८८ पैकी अधिकाधिक आमदार निवडून यावे, यासाठी जीवाचे रान केले. धर्मरावबाबा आत्राम यांना विजयी करण्यासाठी मी स्वत: दोन बैठका घेतल्या,” असेही बावनकुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

हे सुद्धा वाचा ;….Weather alert ;सावधान;मंगळवारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

राष्ट्रवादीच्या स्वबळाच्या घोषणेवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, “प्रफुल्ल पटेल व धर्मरावबाबा आत्राम काय बोलले माहिती नाही. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याची आमची भूमिका आहे.

 

घोषणा झाल्यानंतर वाटाघाटी सुरू करू. मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व निवडणुका एकत्र लढू. आम्ही स्वतंत्र लढणार असल्याची स्थानिक पातळीवर चर्चा चालली आहे. प्रत्यक्षात एकत्र लढण्याचा महायुतीचा निर्णय आहे.

हे सुद्धा वाचा ;….Bollywood News; Shahrukh Khan;ऑर्थर रोड जेलमध्ये असतांना शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान काय खात असे ?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काही समजत नाही. ते अभ्यास करत नाहीत. समजले नाही तर, शिकावे. त्यांना दोन वर्षे विदेशात राहायचे असते आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परराष्ट्र धोरण शिकवतात,” असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

 

दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे स्थिती जाणून घेतली.

हे सुद्धा वाचा ;…. लग्नात भेटीच्या फॉर्च्युनर कारची चाबी अजित पवारांच्या हस्ते दिली ?,आता दादा म्हणतात ‘माझा काय संबंध?

पंचनामे होऊन सर्वांना मदत मिळेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. मतदान करताना नको तर, मतदान केंद्रापर्यंत मोबाईलची परवानगी द्यावी, ठेवण्याची व्यवस्था करावी, ही सर्वांची मागणी होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने पूर्ण केली, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *