तीन दिवस पावसाचे;पहा कोणत्या जिल्ह्याला रेड तर कोट्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
Three days of rain; see which district has red alert and Kotya district has orange alert

राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई पुण्यातही मुसळधार पाऊस कोसळतो आहे. हवामान खात्याकडून राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या २४ तासात कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर पावासाचा जोर आणखी वाढणार असल्याचं हवमान विभागाने सांगितलं आहे.
तसेच, राज्यातील ९ जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, नागपूर, अमरावती या ९ जिल्ह्यांना पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
यादरम्यान, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याशिवाय,
संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पालघरलाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. मुंबईतील दादर, लालबाग-परळसह वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरीवलीत रात्रभरापासून कोसळधार सुरु आहे.
तर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्येही जोरदार पाऊस बरसतो आहे. त्याशिवाय, वसई, विरार, नवी मुंबईतील वाशी, पनवेल भागातही पावसाचा जोर वाढला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून पाऊसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याला पुढील तीन दिवस हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पंचगंगेचे पाणी पातळी सकाळी आठ वाजता ३५ फूट ७ इंचावर होती. तक जिल्ह्यातील
एकूण ७६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची वाटचाल
सध्या इशारा पातळीकडे सुरु आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर संध्याकाळपर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण ७० टक्के भरलं असून धरणाच्या विद्युतविमोचनातून १४०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे.