India’s situation is very bad in the world;सेना नेत्याचा हल्लबोल म्हणाले, भारताची अवस्था जगात अत्यंत बिकट
Army leader's statement said, India's situation is very bad in the world

भाजपने जे दलाल नेमले आहेत, त्यापैकी एक म्हणजे गिरीश महाजन आहेत. मला त्यांच्याविषयी फार काही बोलावं असं वाटत नाही. महाराष्ट्रातील सर्व भ्रष्ट, राष्ट्रद्रोही लोकांना एकत्र करून हा आत्ताच भाजप दिसतोय, त्यातील हे महाशय आहेत.
एकेकाळी भाजप हा पवित्र लोकांचा पक्ष होता, आज या पक्षाची सूत्र दलाल, भ्रष्ट, ठेकेदार यांच्याकडे आहे आणि हे लोक आमचा पक्ष संपवायला निघाले आहेत. हे लोक बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठं आहे असा खडा सवाल राऊतांनी विचारला.
हे सुद्धा वाचा;Will Dhananjay Munde retire from politics?;धनंजय मुंडे यांनी घेतला मन:शांतीचा निर्णय
पक्ष फोडण्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत त्यातील पहिला दलाल गिरीश महाजन आहेत. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणार पहिला माणूस म्हणजे गिरीश महाजन असेल.
मविआचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, यांच्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकश्या सुरू झाल्या, त्यावेळी ते (महाजन) पक्ष बदलायला तयार होते,
हे सुद्धा वाचा;ज्योती मल्होत्रानंतर पुन्हा तिघां गुप्तहेराना महाराष्ट्रात अटक
असा मोठा गौप्यस्फोटही राऊतांनी केला. मी राजकारणातून बाहेर पडतो, शांत बसतो असे निरोप तेच पाठवत होते. हे एक नंबरचे डरपोक लोक आहेत अशी टीकाही राऊतांनी केली.
प्रत्येकाची एक वेळ येतेच. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा तुम्ही आज वापरताय, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही राजकारणात कोण होतात?
हे सुद्धा वाचा;महायुतीचे मंत्री म्हणाले, मंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी
ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली, त्यांचीच शिवसेना संपवण्याची भाषा तुम्ही वापरताय,
लाज कशी वाटत नाही? असा सवाल विचारत गिरीश महाजन जे बोलातता, ती भाषाच त्यांना, पक्षाला घेऊन बुडणार असे टीकास्त्र राऊतांनी सोडलं.
हे सुद्धा वाचा;Ladkya Bhaeen Yojana;लाडक्या बहीण योजना; ‘या’ महिलांना घेता येणार नाही योजनेचा लाभ
शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आत्तापर्यंत अनेकजण या पक्षात आले, बाहेर पडले, त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली.
अमित शहांनी शिवसेना संपवण्यासाठी जंग जंग पछाडलं. पण गिरीश महाजन यांच्या 10 पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. नाचेगिरी करणं म्हणजे राजकारण नाही असा हल्ला राऊतांनी चढवला.
हे सुद्धा वाचा;Marathwada monsoon alert;जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड ;हवामान विभागाचा मराठवाड्याला इशारा
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. सुनील प्रभु आमच्याच पक्षाचे आमदार आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा सुरू असेल तरी ती समोर कशाला येईल? योग्य वेळी ती सांगू ना? असा सवालच त्यांनी केला.
यावेळी संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवरही भाष्य केलं. काही विरोधी पक्षातील खासदार एकत्र भेटणार आहेत. संसदेच विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी जो ड्राफ्ट केला आहे,
हे सुद्धा वाचा;Maharashtra remains dry;20 राज्यांना हाय अलर्ट, पण महाराष्ट्र कोरडाच
त्याच्या मंजुरीसाठी ही बैठक आहे. मीही या बैठकीला जाणार आहे. भारताच्या बाजूने एकही राष्ट्र उभ राहायला तयार नाही. त्याच कारण नरेंद्र मोदी आणि भाजप आहेत. नेपाळ देखील आपल्या बाजूने उभे राहिले नाही, असं राऊत म्हणाले.
भारताला जी-20 परिषदेचं निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. भारताची अवस्था जगात अत्यंत बिकट झाली आहे.
हे सुद्धा वाचा;Holy Hajj Yatra Breaking News;सौदी सरकारने लाखो मुस्लिमांना पवित्र शहर मक्कामध्ये जाण्यापासून रोखले
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने कोणीच उभ राहिल नाही. भारताला जगात एकही मित्र देश नाही. खासदार परदेशात जाऊन गाणी गात आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.