Maharashtra monsoon Alert;देशभरात धो,धो पाऊस, महाराष्ट्रात मात्र मान्सूनचा चकवा
Maharashtra monsoon Alert;Heavy rains across the country, but monsoon is weak in Maharashtra


मान्सूननं घेतलेली मोठी विश्रांती सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकताना दिसत आहे. मात्र विदर्भ आणि कोकण इथं अपवाद ठरत असून, या भागांमध्ये अधूनमधून पावसाच्यचा हलक्या सरींची हजेरी पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पावसानं उघडीप देताच राज्यातील तापमानात मोठे चढ- उतार पाहायला मिळत आहेत.
हे सुद्धा वाचा;ब्रेकिंग न्यूज;सुरक्षा नंबरप्लेट नसेल तर आरटीओ कडून कोणतीही सेवा पुरविण्यात येणार नाही
दरम्यान, विदर्भात मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हजेरीची शक्यता पाहता हवामान विभागानं या भागासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भासह राज्याच्या कोकण आणि महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र मान्सून अभावी तापमानाचा कमाल आकडा पुन्हा एकदा 39 अंशांच्या घरात पोहोचला असून,
चंद्रपूर इथं राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली असून हा आकडा 39.8 अंशांच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा;कानपूर दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या स्वागताला गुन्हेगार ;उत्तर प्रदेशात खळबळ
तिथं पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर ढगांची दाटी पाहायला मिळेल. मात्र वाऱ्याच्या वेगानं हे ढग बरसण्याऐवजी पुढेच निघून जातील अन् इथं ऊन पावसाचा खेळ तिथं पाहायला मिळतो.
दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहणार असून हलका पाऊस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहराच्या किनारपट्टी भागांमध्ये आर्द्रतेचं प्रमाण अधिक राहील, ज्यामुळं उष्मा अधिक तीव्रतेनं जाणवू शकतो.
हे सुद्धा वाचा;Marathwada monsoon alert;जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड ;हवामान विभागाचा मराठवाड्याला इशारा
ईशान्य भारत पावसानं थैमान घातलं असून, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम या राज्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.
मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इथं विविध ठिकाणी पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
हे सुद्धा वाचा;Maharashtra Corona Update;कोरोना अपडेट; कोरोनामुळे 24 तासांत चौघांचा मृत्यू,86 नव्या रुग्णांची नोंद
आसाममधील अनेक भागांमध्ये पाण्याची पातळी वाढली असून 15 जिल्ह्यांमधील जवळपास चार लाख नागरिक यामुळं प्रबावित झाले आहेत.
दरम्यान, राज्यात पुढील 24 तासांमध्ये जवळपास सर्वत्र मध्यम, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा;आता सरकारकडून ई-मेल, व्हॉट्सअँप वरून होणार कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाई
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढच्या 24 तासांमध्ये सिक्कीम आणि पूर्वोत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे,
तर दक्षिण कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी क्षेत्रासह केरळच्या उत्तरेकडील भागांमध्ये मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. तर, अंदमान आणि निकोबार बेट समुहासह पश्चिम हिमालय क्षेत्रातील काही भागांमध्ये हलक्या पावसाची हजेरी असेल.