ग्राहकांसाठी महत्वाची बातमी;एटीएममधून कॅश काढणं महागणार
Important news for customers; withdrawing cash from ATM will be expensive

कॅश काढण्यासाठी वारंवार ATM वापरणाऱ्या ग्राहकांसाठी वाईट बातमी आहे. एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता असून लवकरच एटीएममधून पैसे काढणे महाग होऊ शकते.
होय, बँका लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे ज्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशावर बसेल आणि एटीएम मधून पैसे काढण्यासाठी जादा पैसे किंवा शुल्क मोजावे लागतील.
आमचे सहयोगी इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार भारतातील एटीएम ऑपरेटर्सनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) कडे ग्राहकांकडून रोख पैसे काढण्यावर भरलेले इंटरचेंज फी वाढवण्यासाठी संपर्क साधला आहे.
ATM मधून पैसे काढण्यासाठी ग्राहक जे शुल्क भारतात त्याला इंटरचेंज फी म्हणतात. अशा स्थितीत इंटरचेंज फी वाढल्यास एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना जास्त शुल्क भरावे लागेल.
एटीएम ऑपरेटर्सची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री म्हणजेच CATMI ने म्हटले की इंटरचेंज फी प्रति व्यवहार जास्तीत जास्त २३ रुपये वाढवले गेले पाहिजे.
त्याचवेळी, एटीएम उत्पादक AGS ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीजने म्हटले की त्यांनी प्रति व्यवहार २१ रुपये इंटरचेंज फी वाढवण्याचा प्रयत्न केला,
परंतु इतर अनेक ऑपरेटर्सनी प्रति व्यवहार २३ रुपये ची मागणी केली आहे. अखेरीस २०२१ मद्ये इंटरचेंज फी वाढवण्यात आली होती आणि १५ रुपयांवरून प्रति व्यवहार १७ रुपये करण्यात आली होती.
त्यामुळे मागील बदलानंतर बराच वेळ निघून गेला असून आता पुन्हा एकदा बदल करण्याची गरज असल्याचा ऑपरेटर्सचे मत आहे.
इंटरचेंज फी एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला दिली जाते. समजा तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे डेबिट कार्ड आणि आणि पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममधून पैसे काढत आहात.
तर अशा स्थितीत, व्यवहारासाठी एसबीआयकडून पीएनबीला इंटरचेंज फी भरली जाईल ज्याचा बोजा बँका शेवटी ग्राहकांवर टाकतात. सध्या देशभरातील सहा मेट्रो शहरे – बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद
आणि कोलकाता येथील बँका बचत बँक खातेधारकांना एका महिन्यात किमान पाच विनामूल्य व्यवहार करण्याची परवानगी देतात, तर इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये तीन व्यवहार विनामूल्य करण्याची मुभा देण्यात आली आहे.